आशाताई बच्छाव
अमरावती ग्रामीण ची भरती रद्द नव्हे, पावसामुळे मैदानी चाचणी पुढे ढकलली!
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक .
अमरावती.
जिल्हा ग्रामीण पोलीस दलामध्ये १९ जून पासून पोलीस भरती प्रक्रिया सुरुवात झाली असून, त्या मालिकेत २१ जून रोजी सकाळी मैदानी चाचणी करता १२०० उमेदवारांना बोलविण्यात आले होते; परंतु गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे मैदान पूर्णतः वले झाले. त्यामुळे त्यावर २१ जून रोजी बोलावलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी घेता आली नाही. ज्या उमेदवारांची २१ जून रोजी मैदानी चाचणी होती त्यांची ती चाचणी आता १६ जुलै रोजी होणार आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडून ही माहिती देण्यात आली. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या प्रसिद्ध पत्रकार मुळे धरती रद्द झाल्याच्या आफवांना पूर्णविराम मिळाला आहे. ग्रामीण पोलिसांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया२२ जून व यापुढे दररोज नियमितपणे सुरू राहणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी २२ जून सहा व त्यानंतर मैदानी चाचणी असेपर्यंत दररोज त्यांनी नेमून दिलेल्या दिनांकास पहाटे४.३० वाजता बाय टेकडीच्या बाजूला असलेल्या जोग स्टेडियम येथे हजर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. पावसामुळे मैदान मध्ये झाल्याने केवळ शुक्रवारची भरती प्रक्रिया रद्द झाली आहे. संपूर्ण भारतीय प्रक्रिया रद्द झालेली नाही त्यामुळे कृपया उमेदवारांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असेही ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.