आशाताई बच्छाव
अँड.मनोज संकाये यांच्या निवेदनाची राष्ट्रीय महामार्गाचे अधीक्षक अभियंत्यांनी दखल घेऊन चेंबरी विश्रामगृहाजवळील उड्डाण पुलावरील झाडांची केली तोडणी !
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड/परळी दि: २० जून २०२४ परळी शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांच्या निवेदनाद्वारे केलेल्या मागणीला यश आले असून चेंबरी विश्राम गृहाजवळील उड्डाणपुला वरील धोक्याची असणारी झाडे झुडपे प्रशासनाकडून तोडण्यात आली त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टळली आहे. निवेदनाची गांभीर्याने दखल घेतल्यामुळे त्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अधीक्षक अभियंता श्री सुमन साहेब, परळी तहसीलचे नायब तहसीलदार श्री बी एल रुपनर साहेब आणि परळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांचे आभार मानले आहेत. दिनांक १५ जून २०२४ रोजी त्यांनी निवेदन व वर्तमानपत्रांमध्ये बातमी यासंदर्भात प्रसिद्ध केली होती त्याची तात्काळ प्रशासनाने दखल घेत चेंबरी विश्रामगृहा जवळील उड्डाण पुलावरील नागरिकांना जीवघेणी ठरणारी झाडे झुडपे दिनांक १७ पासून तोडणी केली. यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे अधीक्षक अभियंता यांनी आणि रुपनर साहेबांनी परिश्रम घेतले. झाडे झुडपे वाढल्यामुळे रोडवर अपघाताचे प्रमाण वाढले होते. वाहनधारकांना समोरचे रोडवर पसरलेल्या झाडे व झुडपांमुळे वाहन दिसत नव्हते त्यामुळे तेथे अपघाताचे प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण झाला होता. याच मार्गावरून थर्मल पावर स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच आयटीआय कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी रस्त्याचा वापर करतात. तात्काळ दखल घेतल्याने सध्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जीवघेणी अपघाताचे प्रमाण यामुळे कमी होईल यासाठी त्यांनी निवेदनाद्वारे पाठपुरावा केला आणि या त्यांच्या पाठपुराव्याला प्रशासनाच्या वतीने सकारात्मक कृतीने तेथील झाडांची व झुडपांची तोडणी केली याबद्दल त्यांनी संबंधित कर्मचारी व प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.