आशाताई बच्छाव
भगूर गावाला जोडणारा रस्ता खड्डामय (भगूर प्रतिनिधी सुदर्शन बर्वे)करंजकर गल्ली ते छत्रपती संभाजी महाराज चौक (आहुजा कॉम्प्लेक्स) संपूर्ण रस्ता कॉंक्रिटीकरण असून या रस्त्यावर ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी फोडल्याने या रस्त्यात खड्डे पडले आहे यातच सिमेंट काँक्रेट चे लोखंडी बार खड्ड्या मुळे बाहेर आले आहे सध्या पावसाचे दिवस असल्याने या खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज न आल्याने छोटे-मोठे अपघात होत आहे.भगूर नगरी ही स्वा.वी. दा. सावरकर यांचे जन्म स्थळ म्हणून नाव लौकिक असून या गावाला बरेच नागरिक भेट देत असतात पण हे खड्डे असलेले रस्ते बाहेरून भगूर नागरीला भेट देण्याऱ्या नागरिकांना चर्चेचा विषय होत असून नाशिक बांधकाम विभाग या कडे डोळे झाक करत आहे. भविष्यात या रस्त्यावर एखादा मोठा अपघात झाल्यास त्याच जबाबदार कोण असा सवाल! मनसैनिकांनी पत्रकार द्वारे विचारला आहे… सदरचा काँक्रीट रस्ता कुणाच्या परवानगीने वेळोवेळी खोदला जात आहे की जेणेकरून या रस्ता खोदीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे सदरील रस्ता संबंधित विभागाने लवकरात लवकर काँक्रीटीकरण करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा भगुर तर्फे करण्यात येत आहे सदरील रस्ता लवकरात लवकर दुरुस्त न झाल्यास येथे मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा श्याम देशमुख, भाजपचे निलेश हासे यांनी दिला आहे….