आशाताई बच्छाव
महिलांनी हेवेदावे सोडून कुटुंबव्यवस्था सदृढ बनवावी: मनाली भुतडा
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड/माजलगाव दि: २० जून २०२४ तुझं माझं करण्यापेक्षा महिलांनी हेवेदावे सोडून कुटुंब व्यवस्था सदृढ बनवण्याकडे लक्ष देणे काळाची गरज आहे. डोळ्यावर विशिष्ट रंगाचा चष्मा चढल्यास आपले व्यक्तिमत्व प्रगल्भ होण्याऐवजी दुर्लक्ष करण्याजोगे होते. असे प्रतिपादन सीए सौ मनाली भुतडा यांनी महेश नवमी निमित्त राजस्थानी मंगल कार्यालयात आयोजित महेशरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती लीलादेवी मानधने, व्यासपीठावर पालक समुपदेशक मीरा बंग, तालुका उपाध्यक्ष उमेशकुमार जेथलिया, राधेश्याम लोहिया, संतोष बापू जेथलिया, राजेंद्र इंदानी, सागर मानधने, रमेश चांडक, डॉ कमलकिशोर लड्डा, सौ किरण गिल्डा उपस्थित होते. यावेळी जुगलकिशोर झंवर, जुगलकिशोर भुतडा यांना महेशरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सामाजिक उपलब्धी निमित्त अनेकांना गौरविण्यात आले. यावेळी मानधने परिवाराकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोदकुमार जाजु प्रस्ताविक उमेशकुमार जेथलिया तर आभार जुगलकिशोर काबरा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका माहेश्वरी सभेचे पदाधिकारी, युवा सभेचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.