आशाताई बच्छाव
आरटीओ कडून होणाऱ्या दंडात दुप्पट ते पाचपट वाढ; वाहन चालविणाऱ्यांनो नियमांचे पालन करा
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड दि: १५ जून २०२४ आत्तापर्यंत वेगवेगळ्या नियमांमध्ये आरटीओ कडून वाहन चालकांना देण्यात येणाऱ्या दंडामध्ये चक्क दुप्पट ते पाचपट वाढ झाल्याने वाहन चालकांनी नियम तोडून वाहन चालविल्यास यापुढे मोठे दंड भरण्यास तयार राहावे, अन्यथा नियमांचे पालन करून वाहन चालवावे. मोटार वाहन कायद्यानुसार सीट बेल्ट विना गाडी चालवल्यास पूर्वी २०० रुपये दंड गाडी मालकाला आकारण्यात येत होता आता १००० रुपये दंड मोजावे लागणार आहे. १४ वर्षाखालील मुले मुली गाडी चालवत असतील तर गाडी मालकाला पूर्वी २०० रुपये दंड आकारण्यात येत होता आता १००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. विना हेल्मेट दुचाकी चालवल्यास पूर्वी ५०० रुपये दंड आकारण्यात येत होता आता १००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तेव्हा वाहन चालकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करून गाडी चालवावी अन्यथा आर्थिक दंडाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.