Home नांदेड मतमोजणीमुळे नांदेड शहरातील वाहतुक मार्गात बदल

मतमोजणीमुळे नांदेड शहरातील वाहतुक मार्गात बदल

142

आशाताई बच्छाव

1000427270.jpg

मतमोजणीमुळे नांदेड शहरातील वाहतुक मार्गात बदल
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड दि. 3 :- लोकसभा निवडणूक 2024 ची मतमोजणी 4 जून 2024 रोजी नांदेड शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, बाबानगर, नांदेड येथे होणार आहे. मतमोजणी कालावधीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये 4 जून 2024 रोजी चे सकाळी 6 वाजेपासून ते मतमोजणी कार्यक्रम पूर्ण होईपर्यत वाहतुकीच्या मार्गात बदल करुन पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत अधिसूचना प्रसिध्द केली आहे.

4 जून 2024 रोजी वाहनांच्या वाहतूक व्यवस्थेत तात्पुरत्या स्वरुपात पुढील पर्यायी मार्गावरील वाहतुकीस वळण देऊन बदल करण्यात येत आहे.

वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग

नविन मोंढा कमान ते आयटीएम चौक (कुसूमताई सभाग्रह) कडे जाणारा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद राहील. महात्मा फुले हायस्कूल ते शंकरराव चव्हाण पुतळा (लॉ कॉलेज टि पॉईन्ट) कडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद राहील. उज्वल गॅस ऑफिस ते महादेव दाल मिलकडे येणारा रस्ता वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद राहील.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

अण्णाभाऊ साठे पुतळा येथून आयटीआयकडे जाण्यासाठी नाईकचौक –आनंदनगर-वर्कशॉप ते आयटीआय वाहतुकीसाठी चालू राहील. नविन मोंढाकडे येण्यासाठी आयटीआय वर्कशॉप-आनंदनगर-नाईक चौक ते नविन मोंढा वाहतुकीसाठी चालू राहील. तरी 4 जून 2024 रोजी सकाळी 6 वा. ते मतमोजणी कार्यक्रम पूर्ण होईपर्यत वाहतुकीस अडथळा होवू नये यासाठी पर्यायी मार्गाची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे.

Previous articleमतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक निरीक्षक समीरकुमार ओ.जे नांदेडमध्ये दाखल
Next articleरावेरमध्ये मतमोजणी केली बंद ईव्हीएम मशिनमध्ये घोळ : श्रीराम पाटील यांच्या आरोपाने खळबळ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.