आशाताई बच्छाव
पुणे, हवेली प्रतिनिधी श्री संजय वाघमारे : यावर्षी भीषण पाणीटंचाई, संपूर्ण देशामध्ये यावर्षी भीषण पाणीटंचाई पाहायला मिळाली आहे. देशातील सर्व धरण गेल्या वर्षाच्या तुलनेत सरासरी मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर टक्केवारी मध्ये घसरण झालेली पाहायला मिळाली. त्यामध्ये महाराष्ट्रातील पुणे,छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, धाराशिव, बीड, नाशिक या सर्व जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भीषण पाणीटंचाई पाहायला मिळाले. त्यामध्ये सर्वात जास्त पाणीटंचाई ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पहायला मिळाली. छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी शहरांमध्ये दर आठ दिवसाला टॅंकरने पाणी पुरवले जात आहे. तेथील नागरिकांना पाणी दर आठ दिवसांनी मिळत असल्यामुळे खूप पाणी जपून वापरावे लागत आहे. काही ठिकाणी नागरिकांना टँकर विकतही घ्यावे लागत आहे. पैठणच्या जवळ असलेले जायकवाडी धरण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्याची सरासरी घसरली पाहायला मिळते. भारताची राजधानी दिल्लीत देखील खूप मोठ्या प्रमाणात पाणीटंच पहायला मिळत आहे.एकंदरीत काय तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भीषण पाणीटंचला सामोरे जावे लागत आहे.