आशाताई बच्छाव
बीड जिल्ह्यात विकासाची गंगा आणण्यासाठी पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे – अँड.मनोज संकाये
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड/परळी
बीड लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे त्यामुळे राजकीय वातावरण तापले असून बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याची ताकद महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्यामध्ये आहे. आशा विकासाभिमुख नेतृत्वाला संधी देऊन आपले अमूल्य मत कमळाला देऊन संसदेत पाठवा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांनी केले आहे. बीड लोकसभा निवडणुकीमध्ये दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची कन्या पंकजाताई उभ्या आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्याचा पंकजाताईच्या माध्यमातून विकास होईल तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्याचा विकास झाला त्यामुळे हा विकास अविरतपणे चालू राहणे गरजेचे असून बीडच्या सुज्ञ जनतेने येत्या १३ तारखेला कमळासमोरील बटन दाबून पंकजाताई मुंडे यांना संसदेत पाठवावे आणि बीड जिल्ह्यात विकासाची गंगा आणण्यासाठी तसेच बीड जिल्ह्याचे राहिलेले मागासलेपण दूर करण्यासाठी आणि ऊसतोड मजुरांचा जिल्हा ही ओळख पुसून टाकण्यासाठी मतदान केले पाहिजे. ही निवडणूक ही देशाचा नेता निवडण्याची आहे, देश संरक्षणासाठी, भारत मातेच्या रक्षणासाठी, देश विकासासाठी, मा. श्री नरेंद्रजी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आणि आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी एक खंबीर नेतृत्व देण्याची आहे आणि त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात जिल्ह्याला भर भरून निधी देणाऱ्या ,अशा महायुतीच्या उमेदवार मा. पंकजाताई गोपीनाथराव मुंढे यांनाच येणाऱ्या १३ तारखेला मशीन वरील एक नंबर चे बटण दाबून कमळ या चिन्हाला मतदान करून मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.