Home नाशिक वाहतूक सुरक्षा जागृती काळाची गरज–साईनाथ वीर

वाहतूक सुरक्षा जागृती काळाची गरज–साईनाथ वीर

173

आशाताई बच्छाव

IMG-20230924-WA0029.jpg

वाहतूक सुरक्षा जागृती काळाची गरज–साईनाथ वीर

दैनिक युवा मराठा
निफाड प्रतिनिधी–रामभाऊ आवारे

वाहनांची दैनंदिन वाढती संख्या व त्या तुलनेत अपूरे रस्ते तसेच सुविधांचा अभाव यामुळे रस्ते अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत असल्यामुळे वाहतूक सुरक्षा जागृती करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन नाशिक रस्ते परिवहन विभागाचे सहाय्यक निरीक्षक साईनाथ वीर यांनी केले.
के. के. वाघ कला वाणिज्य विज्ञान व संगणक विज्ञान महाविदयालय चांदोरी, येथे आयोजित वाहतूक सुरक्षा जागृती कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा जागृतीविषयी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दातीर हे होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. दातीर यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या व समाजाच्या स्वास्थ्यासाठी वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सायखेडा येथील जय अंबे मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक श्री. विजय खर्डे यांचे विशेष सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. सावंत, उपप्राचार्य प्रा आहेर, प्रा.राहुल पोटे,प्रा.अमोल खालकर, प्रा.पल्लवी कदम, प्रा.सुप्रिया शिरसाठ, प्रा. दिपाली शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. एन. एस. जाधव यांनी केले तर प्रा. रेशमा कडाळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास कोकाटे, कृष्णा शिंदे, कुणाल निकम, सागर बर्वे, यांनी परिश्रम घेतले.

Previous articleकृषी विभागाने निश्चित केलेल्या नुकसान भरपाईची रक्कम देण्यास मजीप्राची टाळाटाळ.
Next articleआयफोन १५’च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; परराज्यांतील नागरिक मुंबईत दाखल..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.