आशाताई बच्छाव
सेवानिवृत्त शिक्षक नंदकुमार जाधव यांचं निधन रत्नागिरी,(सुनील धावडे)
सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात वावरत असताना आपलं वेगळंपण जपून ठेवणारे असे,पाचल परिसरातील प्रचलित असणारे नंदकुमार जाधव सर यांचं नुकतेच मुंबई येथे आकस्मित निधन झालं या निधनाने परिसरात सर्वत्र हळवळ व्यक्त होत आहे.
नंदकुमार जाधव सर यांनी पाचल येथील सरस्वती विद्या मंदिर या हायस्कूलला शिक्षक म्हणून बरीच वर्ष काम केलं होतं. दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्ती होऊन सामाजिक क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची कामगिरी पाहायला मिळत होती.सध्या ते राजापूर तालुका बौद्धजन संघ, गट क्रमांक 3 चे, तसेच पाचल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पतसंस्थेचे खजिनदार म्हणून कार्यरत होते. हरळ बौद्ध विकास मंडळाच्या सचिव पदाची धुरा देखील ते यशस्वीरित्या सांभाळत होते.
सध्या एका छोट्याशा आजाराशी झगडत असतानाही समाजात वावरताना त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य कधी कमी झालं न्हवतं.या महिन्याच्या 18 तारीख ला मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांना हृदयविकाच्या झटका आला व त्याचवेळी त्यांचा मृत्यू झाला.
आज 27 ऑगस्ट रोजी त्यांचा पुण्यानुमोदन संस्कारविधी व शोकसभेचा कार्यक्रम बौद्ध धम्म संस्कार पद्धतीने त्यांच्या गावं हरळ येथील राहत्या राहत्या घरी आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्या पाश्चात त्यांची पत्नी व तीन मुलं असा परिवार असून समाज्यात वावरताना त्यांनी त्यांच्या प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावामुळे खूप मोठा मित्रपरिवार जोडून ठेवला आहे.