आशाताई बच्छाव
रावणगाव-भाटापुर येथील ग्रामसेवक जि.एस.पवळे विरोधात कार्यवाही नाही झाल्यास दि.१४ आँगस्ट रोजी आमरण उपोषणाचा इशारा
पाच वर्षांपूर्वी म्रुत्य पावलेल्या व्यक्तीच्या नावे पैसे उचल्याचा प्रकार
मुखेढ प्रतिनिधी
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुक्यातील मौजे रावणगाव व भाटापुर येथील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक जि.एस.पवळे यांनी पंतप्रधान आवास योजनेत मंजूर झालेल्या घरकुलाच्या बिलासाठी पैसे घेत आहेत व म्रत व्यक्तीच्या नावे खोटे नामे दर्शवुन शासनाकडून लुट करत आहेत असा आरोप रावणगाव येथील ग्रामस्थ परवेज अहेमदसाब शेख यांनी दि.०५ आँगस्ट रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती मुखेड यांना दिलेल्या एका लेखी निवेदनात म्हटला आहे.
सविस्तर वृत्त असे की,मुखेड तालुक्यातील मौजे रावणगाव-भाटापुर येथील ग्रामपंचायत या ना त्या कारणामुळे ग्रामपंचायतीने केलेल्या गैरकारभारा बाबत सतत तालुक्यात चर्चेला राहिली आहे. या अगोदरही या गावातील अनेक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या अनियमिततेला कंटाळून वेळोवेळी संबधिताकडे लेखी व तोंडी तक्रारी केल्या होत्या पण अद्याप या ग्रामपंचायतीच्या अनियमिततेची म्हणावी तशी सखोल अशी चौकशी एकदाही करण्याचे धाडस प्रशासनाने दाखवले नाही. गटविकास अधिकारी मुखेड यांना २१ जानेवारी २०२२ व २८ मार्च २०२२ व २२ जुलै २०२२ व उपजिल्हाधिकारी साहेब देगलुर यांना दि.२७ जुलै २०२२ तसेच जिल्हाधिकारी नांदेड व मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांना १२ एप्रिल २०२२ असा लेखी स्वरुपात पत्रव्यवहार करूनही संबंधित ग्रामसेवकावर कसल्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक अशी भूमिका घेऊन शेवटी दि.१४ आँगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती मुखेड समोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
येथील ग्रामपंचायतीचा गाडा एक राजकीय व्यक्ती सांभाळत असल्याने यांचे धागे दोरे नांदेड जिल्ह्यातील बड्या राजकीय नेत्यांसोबत असल्याने या ग्रामपंचायतीची सखोल अशी चौकशी एकदाही होत नाही असा आरोप येथील ग्रामस्थ करत आहेत. जिल्हा पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी लेखी तक्रारी करूनही,अनेक वेळा या ग्रामपंचायतीच्या अनियमीतते बद्दृल वर्तमानपत्रांतून बातम्या प्रसिद्ध होऊनही साधं चौकशी करण्याचे सोयीस्कर जिल्हा प्रशासन का करत नाही? असा सवाल येथील ग्रामस्थ हे करत आहेत.
मंजुर झालेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाचे बिले काढण्यासाठी लोकांकडून पैसे घेणे व ज्या लाभार्थ्यांनी पैसे दिले नाही अशा लाभार्थ्यांची आँनलाईन त्रुटी काढून मुद्दाम बिल न काढने. बेसिमेंट न करता पैसे घेऊन जे लाभार्थी नियमात नसताना सुद्धा दुसरा हफ्ता देण्यात येतोच कसा? असा सवाल ही त्यांनी या निवेदनात केला आहे. पाच वर्षांपूर्वी म्रत पावलेल्या मयत व्यक्तीचे बिले काढण्यात आले असल्याचा असा गंभीर आरोपही त्यांनी या निवेदनात केला आहे. या निवेदनाच्या प्रती तहसील कार्यालया मुखेड व पोलीस स्टेशन मुखेड यांनाही देण्यात आले.
_________________________
रावणगाव-भाटापुर येथील ग्रामसेवक जि.एस.पवळे सारख्या अशा भ्रष्ट कर्मचाऱ्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा दि.१४ आँगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती मुखेड समोर आमरण उपोषणास बसेन.
ग्रामस्थ,परवेज शेख.