Home गडचिरोली शेवटच्या टोका पर्यंतच्या (टेलपर्यंत) शेतीला पाणी मिळेल अशी सोय करा आमदार डॉक्टर...

शेवटच्या टोका पर्यंतच्या (टेलपर्यंत) शेतीला पाणी मिळेल अशी सोय करा आमदार डॉक्टर देवरावजी होळी

111

आशाताई बच्छाव

IMG-20220802-WA0019.jpg

शेवटच्या टोका पर्यंतच्या (टेलपर्यंत) शेतीला पाणी मिळेल अशी सोय करा

आमदार डॉक्टर देवरावजी होळी

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
रेगडी जलाशय येथे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते जलपूजन

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे शुभ हस्ते शेतीला पाणीपुरवठा सुरू

शेतीच्या शेवटच्या टोकापर्यंत (टेलपर्यंत) सर्वांनाच पाणी मिळावे अशी व्यवस्था जल व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी करावी असे निर्देश गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी रेगडी जलाशय येथील जलपूजनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना दिलेत.

यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या शुभहस्ते शेतीकरिता पाणी सोडण्यात आले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेशजी शहा ,महामंत्री सुशांतजी राय, तालुका महामंत्री साईनाथजी बुरांडे, ज्येष्ठ भाजप नेते जयरामजी चलाख ,भोजराज भगत, जलसंपदा विभागाचे उपअभियंता श्री मेश्रामजी ,कनिष्ठ अभियंता विकासजी दुधबावरे, वन विभागाचे अधिकारी , कर्मचारी यांचे सह शेतकरी व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते

रेगडी जलाशयाच्या माध्यमातून या परिसरातील हजारो हेक्टर शेतीला पाणी मिळत आहे. गडचिरोली जिल्हा हा वनाने व्याप्त असल्यामुळे या ठिकाणी सिंचनाचे प्रकल्प फार कमी आहेत. अशा स्थितीमध्ये पाण्यासाठी शेतकऱ्यांची वाताहत होत असते त्याकरिता जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची योग्य नियोजन करून या जलाशयाच्या पाण्याच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांचे समाधान कसे करता येईल याबाबत नियोजन करावे व पाण्याचे वितरण करताना शेवटच्या टोकावर असलेल्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी कसे दिले जाईल याची व्यवस्था करावी असे निर्देश त्यांनी या कार्यक्रमाच्या प्रसंगी केले.

Previous articleघोट येथील जिल्हा परिषद महाविद्यालय येथे विज्ञान ११ वी च्या २ ऱ्या तुकडीला मान्यता देऊन तातडीने प्रवेश प्रक्रिया सुरू करा
Next article!!तालुक्यात लवकरच भव्य क्रीडांगण तयार करणार!! आ, डॉ, देवराव होळी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.