आशाताई बच्छाव
कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे युवा मराठा न्युज नेटवर्क
चालू हंगामात उन्हाळ कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडत आहे. साधारण फेब्रुवारी,मार्च महिन्यात काढलेला कांद्याचे भाव वाढतील या अपेक्षे शेतकऱ्यांनी आपापल्या पद्धतीने कांदा साठवून केला आहे.परंतु अशातच पावसाने सतत धार चालू केल्याने कांदा बाजार समितीत आणनेही अवघड झाले होते.आता पावसाने उघडीप दिली. परंतु कांदा बाजार समितीत कांद्याचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्याने किंवा वाहन भाडे सुद्धा निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी पूर्णपणे आर्थिक अडचणीक सापडला जात आहे. अशातच पावसाने भाजीपाला पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला किंवा कांद्याचा कुठलाही उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी पूर्णपणे नाराज आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा कांदा चाळीतच पडू आहे. अशाच नाकेड तर्फे कांदा खरेदि बंद केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा बाजार समिती कवडीमोल घेऊन व्यापारी वर्गाकडून क्रुर चेष्टा केली जात आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्या नुसार किमान उत्पादन खर्चाचा विचार करून कांद्याला योग्य तो भाव दिला पाहिजे हीच अपेक्षित शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत विविध संघटनांनी शासनाला वेळोवेळी सूचना दिली आहे. परंतु शासन याबाबत गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाही.
उन्हाळ कांद्यांना योग्य तो भाव नसल्याने कांदा चाळीतच पडून आहे. व तो आता पूर्णपणे खराब होण्याच्या मार्गावर आहे. तरी शासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष द्यावे व कांदा उत्पाद शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे धोरण जाहीर करावे.
सतीश अर्जुन भामरे
कांदा उत्पादक शेतकरी (पिंगळवाडे)