आशाताई बच्छाव
विद्यार्थी पटसंख्या अभावी बहुतांशी जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या मार्गावर.
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे
बागलान तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात बहुतांश आदिवासी लोक वस्ती आहेत. यात सर्व शिक्षा अभियान अंतर्गत बहुतेक वाडी वस्त्यांवर वस्ती शाळांची निर्मिती झाली होती. परंतु कालांतराने ह्या शाळा ओस पडू लागले आहेत. कारण या शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या प्रमाणापेक्षा कमी होत असल्याने नाईलाजास्तव शालेय शिक्षण विभाग यांना या शाळा बंद कराव्या लागत आहेत. दिनांक .२८.६.२०२२ रोजी आमच्या प्रतिनिधीच्या निरीक्षणात ह्या शाळा निदर्शनास आले. त्यात साल्हेर पासून दहा किलोमीटर अंतरावर असणारे भिकार सोंडा या गावात साधारण दोन ते तीन वर्षापासून शाळा बंद झाली आहे.आता सध्या या गावातील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना बाहेर गावी शिक्षणासाठी जावे लागत आहे. आमच्या प्रतिनिधींनी जेव्हा स्थानिक रहिवाशी यांच्याशी चर्चा केली तेव्हा लक्षात आले की शासकीय आश्रम शाळा व इंग्रजी शाळा यांचा जो विद्यार्थी पट वाढवण्याचा कयास चालू आहे याचा बळी जिल्हा परिषद शिक्षण विभाग व जिल्हा परिषद शाळा पडत आहेत. स्थानिक रहिवाशी यांच्या म्हणण्यानुसार आमची सुद्धा इच्छा नाही आमचे मुले दुसऱ्या गावाला शिक्षणाला जावे परंतु नाईलाज असतो आमच्या गावात पट संख्या नसल्याने आम्हाला आमचे मुलं दुसरीकडे पाठवावी लागत आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग किंवा तालुका गटविकास अधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे व जिल्हा परिषद शाळेचा पट वाढवण्यास पूर्णपणे प्रयत्न करावेत.जेणेकरून आदिवासी मुलांना, मुलींना शिक्षणापासून वंचित न राहता आपले शिक्षण किमान पहिली ते चौथीपर्यंत गावातच पूर्ण होईल …..