आशाताई बच्छाव
सांसदिय संकुल विकास परियोजने अंतर्गत केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गावांचा भौगोलिक विकास साधा.
खा.अशोकजी नेते.
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
सांसदिय संकुल विकास परियोजने अंतर्गत भारत सरकारने धानोरा तालुक्यात 25 गावांची निवड करण्यात आली. या मूलभूत गरजांची पूर्तता करून विकासाच्या मूळ प्रवाहात आणणे आहे. गावामध्ये मजुरवर्गाना व स्थानिक पातळीवरील लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे जेणेकरून स्थानीक मजुर जिल्ह्याच्या बाहेर किंवा अंतर राज्यामध्ये रोजगारासाठी पलायन केले जाते ते थांबवून गावातील स्थानिक,लोकांना किंवा मजुरांना जाऊ नये याकरिता त्यांना सांसदीय विकास संकुल परियोजना अंतर्गत रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे त्यासाठी धानोरा तालुक्यातील 25 गावांमध्ये, शासनाचे कर्मचारी म्हणून गावातील भौगोलिक विकास कसा साधता येईल. त्याकरीता ग्रामसेवक, तलाठी यांची भूमिका महत्त्वाची असते. या कार्यक्रमाप्रसंगी कृषी विभागाचे अधिकारी, सिंचाई विभाग,वनविभाग,भु विभाग,बँकिंग अधिकारी या सर्व विभागातील विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन 25 गावांचा विकासाच्या दृष्टिकोनातून संसदीय संकुल विकास परियोजना अंतर्गत चातगांव येथे विस्तारित बैठकीच्या कार्यक्रमाप्रसंगी मान.खा.अशोकजी नेते यांनी प्रतिपादन केले.
त्यावेळी सरपंच श्री.गोपालजी उईके,डॉ.खटी साहेब जि.उपाध्यक्ष,रेखाताई डोळस महिला प्रदेश सदस्य,अक्षय उईके,संजय बारापात्रे, टिचकुले (BDO),कोमलवार(ABDO),जुवारेजीफटिंगजी उपअभियंता,अमोल चकनलवार,तसेच कार्यकर्ते व मोठ्या संख्येने गावातील नागरिक तसेच संपूर्ण विभागाचे कर्मचारी, अधिकारीवर्ग, उपस्थित होते.