राजेंद्र पाटील राऊत
मुखेड तालुक्यातील रस्त्याना भस्मासुरांचे स्वरुप!
गोजेगाव ,मुक्रमाबाद ते रावी रस्ता बनला मौत का कुवा
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील गोजेगाव ते रावी हा रस्ता प्रवास करण्यायोग्य राहिलेले नाहीत. या रस्त्याचे कोणत्याही पुढार्यांना देण – घेण असलेल्याचे दिसत नाही. नागरिकांनी वारंवार मागणी करून सुद्धा हा रस्ता खड्डेमयच आहे. हा रस्ता वर्षानुवर्षे तसाच आहे, डागडुजी करून नेमका निधी जातो कुठे याबाबत सर्वच अनभिज्ञ आहेत. कुठे तरी थातुरमातुर खडी, मुरूम टाकून बिले उचलण्याचे उद्योग केले जात आहेत. गुडघाभर पडलेले खड्डे पावसाळ्यापूर्वी व्यवस्थित बनवावेत अन्यथा हा रस्ता पावसाळ्यात पांदन रस्ता होईल ? असे प्रवाशांना वाटत आहे. प्रवास करतानाच्या मरण यातना कधी कमी होतील व हा रस्ता कधी दुरुस्त होईल हाच प्रश्न वाहनधारकांच्या मनात सारखा भिडत आहे.
चौकट
थातुरमातुर दुरुस्त्याही बंद
मागील तीन वर्षांपूर्वी अनेक रस्त्याबाबत टेंडर निघून थातूरमातूर डांबर टाकाले जायचे. मात्र आता हा रस्ता पुर्न उकडुन गेला तरी कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण साहेब या रस्त्याकडे स्वतः लक्ष दिले तर बरे होईल असे जनतेतून बोललं जातं आहे.
चौकट
रस्त्यातच महिला बाळंतीन
गोजेगाव ते रावी पर्यंत हा रस्ता गुडघे भर खड्यातुन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या खड्ड्यांमुळे महिला रिक्षातच बाळंतीन होण्याच्याही घटना यापुर्वीही घडल्या आहेत. तर रुग्ण दवाखान्यात घेऊन जात असताना मुत्यु झाल्याची घटना घडलेल्या आहेत. हा रस्ता दुरुस्त करून नागरिकांच्या मरण यातना थांबवावेत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
चौकट
तात्काळ रस्ते दुरुस्ती करा अन्यथा तीव्र आंदोलन
मुखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते व गोजेगाव ते रावी पर्यंतचा रस्ता तात्काळ दुरूस्त करण्यात यावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे मुखेड तालुकाध्यक्ष दत्ता पाटील माळेगावे, संभाजी ब्रिगेडचे विधानसभा अध्यक्ष मनोज पाटील बनबरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाअध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर,अनिल पाटील दापके यांनी दिला आहे.




