राजेंद्र पाटील राऊत
पंचनाम्यासाठी पैसे घेणाऱ्यांची तक्रार करा,कार्यवाही होईप्रयन्त पाठीशी राहू:-कलंबरकर.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
प्रतिनिधी)-दिनांक १४ सप्टेंबर रोजी आलेल्या महापुराने होत्याचे नव्हते करून टाकले आहे.शेती,घर,पूल वाहून गेली.संसार उघड्यावर आला.प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी गावनिहाय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून आदेश दिले.प्रशासन नुकसानीचे पंचनामे करत आहे.हे पंचनामे करतांना अत्यंत निंदनीय प्रकार होत आहेत.संकटात सापडलेल्या व्यक्तींचे पंचनामे करतांना पैसे घेण्याच्या तक्रारी तालुक्यातून येत आहेत.अशी तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवाजिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी तालुका कृषी अधिकारी बिऱ्हाडे साहेब यांच्याकडे केली.तेव्हा त्यांनी पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची तक्रार करा.तीन दिवसात त्यांच्यावर कडक कार्यवाही करू,असा शब्द दिला आहे.
शेतकऱ्यांनी पंचनाम्यासाठी पैसे देण्याची गरज नाही.पैसे मागणाऱ्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्यांनी तक्रार करावी,आपण कडक कार्यवाही होईप्रयन्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंभिर उभे राहू,असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवाजिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी केले.