राजेंद्र पाटील राऊत
महाराष्ट्रात चक्रीवादळाचा फटका प्रशासनाचे सतर्क
राहण्याबाबत नागरिकांना आवाहन १५ व १६ मे
(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)
पालघर- अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आज दिनांक १५ मे ते उद्या १६ मे पर्यत मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे प्रशासने कळविले आहे.
प्रति तास ४० किमीच्या वेगाने वादळी वारे वाहण्याची भिती व्यक्त करण्यात आली असून,रायगड पालघर जिल्ह्यातील कच्च्या मातीच्या घरामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित जागेवर आधार शोधण्याचे प्रशासनाने सुचीत केले आहे.या वादळी वा-याचा फटका महाराष्ट्रातील काही भागात बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे.तर वातावरण ढगाळ व पावसाळा सदृश्य राहिल असे हवामान तज्ज्ञ यांनी मत व्यक्त केले आहे.