Home कोल्हापूर बैलशर्यत सुरु होणेबाबात मा.खा.राजू शेट्टींना अविनाश गुरव यांचे निवेदन

बैलशर्यत सुरु होणेबाबात मा.खा.राजू शेट्टींना अविनाश गुरव यांचे निवेदन

181

राजेंद्र पाटील राऊत

बैलशर्यत सुरु होणेबाबात मा.खा.राजू शेट्टींना अविनाश गुरव यांचे निवेदन

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील भादोले गावातील एका बैलाच्या वाढदिवसाला आलेल्या माजी. खासदार राजू शेट्टी साहेब यांना शर्यत सुरू होणेबाबत निवेदन देण्यात आले. ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळण्यासाठी बैलगाडी शर्यत गरजेची असून राज्यशासनाने अध्यादेश काढून बंदी घातलेल्या बैलगाड्यांच्या शर्यती पुन्हा सुरु कराव्यात. यासाठी शेतकरी संघटनेचे नेते मा.खा.राजू शेट्टी साहेब यांनी सुद्धा जातीने लक्ष घालावे. व शर्यत सुरू होणेसाठी प्रयत्न करावा अशा आशयाचे निवेदन अविनाश गुरव (भादोले) यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस हातकणंगेले विधानसभा अध्यक्ष मा. संदेश भोसले यांच्या मार्गदर्शानाखाली दिले.
निवेदनात म्हटले आहे की, राज्याला बैलगाडी शर्यतींची मोठी परंपरा आहे. ग्रामिण अर्थकारण या शर्यतीच्या खेळांवर अंवलंबून आहे. बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने व्यापारी वर्ग, वाहतूक व्यावसायिक, छोटे व्यावसायिक, बैलगाडी व्यवसायिक यांची नाळ या व्यावसायाशी जोडली गेली आहे. बैलगाडी शर्यती बंदीचा निर्णय झाल्यापासून या खेळाशी निगडीत सर्व व्यवसायांना मंदीचे दिवस आले आहेत, ही मरगळ झटकून टाकण्यासाठी आणि येथील अर्थकारणाला चालना मिळण्यासाठी शर्यती सुरु करणे हाच एकमेव पर्याय आहे.
महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीमध्ये खिलार ह्या जातीचे बैल वापरले जात असतात. खिलार ही जमात देशी गाईचा वंश म्हणून ओळखली जाते. खिलार जातीचे बैल शेतीमध्ये मशागत करण्यासाठी चांगल्या जातीचे बैल म्हणून ओळखले जात असतात. या बैलांची शाररिक क्षमता वाढविण्यासाठी शर्यत सारख्या खेळांची गरज आहे. शासनाने या सार्‍या गोष्टींचा तातडीने विचार करण्याची आवश्यकता आहे.
क्रिडा प्रेमींचा उत्साह वाढण्यासाठी बैलगाडी शर्यत हा ग्रामिण भागातील एकेकाळी महत्वाचा खेळ मानला जात होता. या खेळाशी ग्रामिण भागातील लाखो तरुणांचे भावनिक नाते आहे. ग्रामिण भागात यात्रोत्सवात भरविण्यात येणार्‍या बैलगाडी शर्यतींच्या निमित्ताने होणारी अर्थिक उलाढाल ही मोठी आहे. या बाबींचा विचार करुन बैलगाडी शर्यत सुरु होणेकरिता आपण लक्ष घालावे..
निवेदन देतेवेळी विजय पाटील , अनिल अवघडे , राहूल पाटील , शिवाजी खुपेरकर , संकेत पाटील , भूषण पाटील आदी उपस्थित होते.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleवडगांव मार्केट कमिटीच्या वतीने मा.खासदार डाँ.निवेदिता माने यांचा व मोहन शिंदे यांचा सत्कार .
Next articleदै.पुढारी समुहाच्या चेअरमनपदी डाँ .श्री.योगेश जाधव साहेब यांची निवड झालेबद्दल सत्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.