आशाताई बच्छाव
छत्रपती शिवाजी महाराज सोशल अवॉर्डने राजेंद्र पाटील राऊत यांचा गौरव मालेगाव (जि. नाशिक) प्रतिनिधी– समाजकार्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मालेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील राऊत यांना प्रतिष्ठित “Chhatrapati Shivaji Maharaj Social Award 2026” प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान Famous People India World या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्या वतीने देण्यात आला.
सदर पुरस्कार स्वराज्य, धैर्य आणि सामाजिक नेतृत्व या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर प्रेरित असून, समाजकल्याण व समुदाय विकासासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल म्हणून हा गौरव करण्यात आला आहे.
राजेंद्र पाटील राऊत हे आश्रयआशा फाऊंडेशन, वऱ्हाणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून त्यांनी ग्रामीण भागात सामाजिक जागरूकता, शैक्षणिक प्रबोधन, महिला सक्षमीकरण आणि विविध जनकल्याण उपक्रम राबवून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे कार्य सातत्याने केले आहे.
दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदान करण्यात आलेल्या या सन्मानपत्राद्वारे त्यांच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. पुरस्कार प्रमाणपत्रावर संस्थेचे संस्थापक राजेश पांडा यांच्या हस्ते अधिकृत स्वाक्षरी करण्यात आली असून MSME नोंदणीसह विविध प्रमाणित मान्यतांचा समावेश आहे.
या सन्मानाबद्दल विविध सामाजिक संस्था, सहकारी व नागरिकांनी राजेंद्र पाटील राऊत यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हा पुरस्कार समाजसेवेच्या वाटचालीत नवी ऊर्जा व प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.






