आशाताई बच्छाव
शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव-वसमाणे परिसरात केळी, पपई पिकांचे मोठे नुकसान…
(शिंदखेडा प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)
शिंदखेडा तालुक्यातील तापी काठावरील लोहगाव-वसमाणे परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळामुळे केळी व पपईसह ऊस, कापूस, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी काल (दि.२८) सकाळी ११ वाजता स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी तत्काळ मदत
शेतकरी हतबल; शानाभाऊ सोनवणे यांची तात्काळ मदतीची मागणी
शासनाने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.आईच्या निधनाचे दुःख बाजूला ठेवत शानाभाऊ सोनवणे यांनी शेतकऱ्यांचे अश्रू पुसले. यावेळी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून तात्काळ पंचनामे करण्यात आले. यावेळी सोनवणे यांनी अप्पर तहसीलदार संभाजी पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत ज्या पद्धतीने लोहगाव-वसमाणे येथे पंचनामे करण्यात आले आहेत, त्याच
पद्धतीने शिंदखेडा तालुक्यातील सर्वच गावांमध्ये पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दोन ते तीन दिवसांत सहानुभूती अनुदान मिळाले पाहिजे, असे सांगितले. पावसामुळे झालेले प्रचंड नुकसान पाहून शेतकऱ्यांमध्ये हतबलता असून शासनाने तातडीने मदतकार्य सुरू करावे, अशी मागणी शानाभाऊ सोनवणे यांनी केली आहे. यावेळी लोहगाव-वसमाणेचे माजी सरपंच महेंद्र पाटील, धमाणे येथील दादाभाऊ पाटील, शेतकरी जगदीश पाटील, सतीश माळी, जगन्नाथ माळी, सुनील पाटील, मुरलीधर पाटील, राजेंद्र पाटील, चंद्रशेखर पाटील, ईश्वर माळी यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.






