Home जालना उद्योजक घनश्यामदास गोयल यांच्या हस्ते स्त्री दुर्गा जागर मंडळाची आरती शेतकऱ्यांवरील संकट...

उद्योजक घनश्यामदास गोयल यांच्या हस्ते स्त्री दुर्गा जागर मंडळाची आरती शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्याची प्रार्थना

48

आशाताई बच्छाव

1002004211.jpg

उद्योजक घनश्यामदास गोयल यांच्या हस्ते स्त्री दुर्गा जागर मंडळाची आरती
शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्याची प्रार्थना

जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) :
जालना शहरातील सामाजिक कार्यकर्त्या नंदा पवार यांच्या स्त्री दुर्गा जागर मंडळाची गुरूवारी उद्योजक घनश्यामदास गोयल यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

शिवनगर येथील चांभारकुंड परिसरात नंदा पवार यांनी स्थापलेले या मंडळाचे आयोजन भक्तिभावाने पार पडले. या वेळी गोयल यांनी देवी यल्लमा समोर अतिवृष्टीमुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे, शेतकरी संकटात आहेत, यापुढे शेतकऱ्यांवरील संकट टळो व त्यांना बरकत मिळो, जनतेचे आरोग्य निरोगी राहो असे साकडे घातले.

यावेळी ढोर समाजाचे जेष्ठ नेते मुरलीधर चांदोडे यांनी गोयल यांचा सत्कार केला. कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या नंदा ताई पवार, गणेश चांदोडे, सुरज यलगंठवार, सचिन क्षिरसागर, गजानन ठोंबरे, कुलदीप चांदोडे, समाधान खाडे, राजकुमार पोळ, गणेश बागडे, सचिन जेवाळ, लक्ष्मण भोरे, आकाश चांदोडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रम भक्तिभावाने पार पडला आणि उपस्थितांनी देवीस सामूहिक प्रार्थना करून शेतकऱ्यांसाठी कल्याणाची इच्छा व्यक्त केली.

Previous articleआधार ग्रुपच्या वतीने आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
Next articleयुवा मराठा परिवाराचे आवाहन….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.