Home उतर महाराष्ट्र लक्ष्मण हाकेंवर हल्ला करणारे तिघे जेरबंद; पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

लक्ष्मण हाकेंवर हल्ला करणारे तिघे जेरबंद; पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

62

आशाताई बच्छाव

1002001848.jpg

लक्ष्मण हाकेंवर हल्ला करणारे तिघे जेरबंद; पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती                                    अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे 

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर हल्ला करणारे तिघे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. हाके यांच्यावर अहिल्यानगर तालुक्यातील अरणगाव शिवारात हल्ला झाला होता.
लक्ष्मण हाके हे आहे आज (ता. २७) पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर येथे ओबीसी एल्गार सभेसाठी जात असताना अरणगाव शिवारातील रस्त्यावर लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर तरुणांनी हल्ला केला. हल्ला झाला त्यावेळी लक्ष्मण हाके यांच्यासोबत पोलीस बंदोबस्त होता. या घटनेतील हल्ला करणारे तिघे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरुद्ध अहिल्यानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक घार्गे यांनी दिली.

Previous articleआमदार संतोष रावसाहेब पाटील दानवे हे सेवा पंधरवडा निमित्य वृक्षारोपण करताना व स्वच्छता अभियान राबवताना
Next articleओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर नगरमध्ये हल्ला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.