Home उतर महाराष्ट्र नरडाण्यात ‘डिफेन्स हब’ व्हावा मंत्री जयकुमार रावल यांची मागणी

नरडाण्यात ‘डिफेन्स हब’ व्हावा मंत्री जयकुमार रावल यांची मागणी

173

Yuva maratha news

1001809783.jpg

नरडाण्यात ‘डिफेन्स हब’ व्हावा मंत्री जयकुमार रावल यांची मागणी

(केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची घेतली भेट)

विरदेल प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील

दोंडाईचा : राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार रावल ांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी धुळे जिल्ह्यातील नरडाणा ता. शिंदखेडा येथे ‘डिफेन्स हब’ स्थापन करण्याची मागणी केली. या मागणीवर मंत्री राजनाथ सिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे एमआयडीसी विकसित असून, डीएमआयसी (दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर) मंजूर आहे, अनेक उद्योग याठिकाणी कार्यरत असून, औद्योगिक दृष्टिकोनातून नरडाणा परिसर अत्यंत पोषक मानला जातो. मंत्री जयकुमार रावल यांनी मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे याबाबत अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यात नरडाणा येथे डिफेन्स हबसाठी आवश्यक प्रशस्त व मोकळी जागा उपलब्ध आहे, तापी नदी जवळच असल्याने भरपूर पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग येथूनच जात असल्याने रस्त्यांची उत्तम कनेक्टिव्हिटी, मध्य व पश्चिम रेल्वेची उपलब्धता, यामुळे दळणवळण सुलभ होते, आधीपासूनच औद्योगिक वातावरण तयार असून, पायाभूत सुविधा सक्षम या सर्व बाबी लक्षात घेता, नरडाणा येथे ‘डिफेन्स हब’ मंजूर करणे हे केंद्र सरकारच्या संरक्षण उत्पादन स्वावलंबन धोरणाशी सुसंगत तरेल, असेही मंत्री रावल यांनी या भेटी दरम्यान नमूद केले. या सकारात्मक संवादामुळे नरडाणा परिसराच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला नवीन गती मळण्याची शक्यता निर्माण झाली आहे

Previous articleसौरऊर्जेवर चालणाऱ्या मल्टीपरपज कोल्ड स्टोरेजमुळे शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
Next articleविरदेल येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा……
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.