आशाताई बच्छाव
१२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केल्याने शिंदखेडा भाजपा कडून फटाके फोडत जल्लोष
शिंदखेडा प्रतिनिधी–राकेश बेहेरे पाटील
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तब्बल १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ जिंजी या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक हेरिटेज दर्जा मिळाला. हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण ठरला आहे. हा सुवर्णक्षण शिंदखेडा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पूजन करून फटाके फोडत भाजपातर्फे जल्लोष साजरा करण्यात आला.
याप्रसंगी गटनेते अनिल वानखेडे, माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील, माजी नगरसेवक चेतन परमार, जिल्हा सरचिटणीस प्रवीण माळी, माजी शहराध्यक्ष अँड विनोद पाटील, शहराध्यक्ष संजयकुमार महाजन, बबलू देवरे, संजय मंगा माळी, गोपाल माळी, दादा मराठे, गोपाल चौधरी, सुभाष माळी, बबलू मराठे, गुलाब सोनवणे, देविदास माळी, मास्टर टेलर, भूपेंद्रसिंह राजपूत, राहुल महिरे, बरून कुमार आदींची उपस्थिती होती.
स्वराज्याची राजधानी रायगड, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, महाराजांनी ज्या किल्ल्यावर अफजलखानाला नेस्तनाबूत केले तो प्रतापगड, राजाचं जन्मस्थान शिवनेरी, स्वराज्याच्या नौदलाचं प्रमुख केंद्र जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाता पायांचे उसे आहे तो सिंधुदुर्ग, लोहगड, साल्हेर, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, खांदेरी (महाराष्ट्र) आणि जिंजी (तामिळनाडू) या किल्यांचा हेरिटेजमध्ये समावेश झाला आहे.






