Home उतर महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेच्या निवेदनाची आमदार मंजुळाताई यांनी घेतली दखल

कांदा उत्पादक संघटनेच्या निवेदनाची आमदार मंजुळाताई यांनी घेतली दखल

124

आशाताई बच्छाव

1001676331.jpg

कांदा उत्पादक संघटनेच्या निवेदनाची आमदार मंजुळाताई यांनी घेतली दखल

पावसाळी अधिवेशनात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित.

धुळे नंदुरबार संदीप पाटील ब्युरो चीफ 

विधानसभेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार मंजुळाताई गावित यांनी कांदा उत्पादकांना हमीभाव द्यावा, साक्री तालुक्यात वीज प्रतिबंध योजना त्वरित बसवावी अशी मागणी आपल्या भाषणात केली आहे.

शेतकरी सुखी तर राज्य सुखी हा शेतकऱ्यांचा हिताचा विचार केंद्रस्थानी ठेवून राज्यातील बळीराजाला धैर्य देणे त्याला बळकट करणे आणि शेतीला नैसर्गिक आपत्ती पासून वाचवण्यासाठी श्वासत उपाय योजना केल्याबद्दल मी केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे मनापासून अभिनंदन

पावसाळी अधिवेशनात अध्यक्ष महोदयांसमोर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करताना साक्री तालुक्याच्या आमदार सौ मंजुळाताई गावित

करते असे मंजुळा ताईंनी आपल्या भाषणात विचार मांडले.

आमदार मंजुळा गावित यांनी आपल्या भाषणात साक्री तालुक्याच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला तो म्हणजे अध्यक्षांना असे सांगितले की माझ्या मतदारसंघात दि.६ ते ७ मे पासून पाऊस सुरू झाला आहे. त्यात शेतकऱ्यांची कांद्याचे फार मोठे नुकसान झाले आहे पंचनामे झाले

आहेत परंतु अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. नुकसान भरपाई अनुदान तातडीने मिळावे आणि कांद्याला हमीभाव ३५०० रु. पर्यंत तरी मिळायला पाहिजे अशी विनंती अध्यक्ष महोदयांना आमदार त्यांनी केली. जसे की गुजरात राज्यात शेतकऱ्याला दोनशे रुपये अनुदान दिले त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र सरकारने सुद्धा शेतकऱ्यांना पाचशे रुपये अनुदान द्यावे ही विनंती आमदार ताईंनी अध्यक्ष महोदयांना केली आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर आमदार मंजुळा गावित पावसाळी अधिवेशनात आपले भाषण गुरुवार दि. ३.६.२०२५ रोजी केले.

Previous articleशिधापत्रिकाधारकांना ई- केवायसीसाठी आवाहन
Next articleदेवशयनी आषाढी एकादशीनिमित्त ब्राह्मण सेवा मंडळाच्या — लासलगाव येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात महाअभिषेक संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.