आशाताई बच्छाव
पावसाअभावी खरीपाची पिके धोक्यात; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
यंदाच्या खरीप हंगामात पुर्व मोसमी पाऊस मे महिन्यात झाला तसेच मृग नक्षञाच्या सुरुवातीला देखील जोरदार पाऊस झाला तसेच असंख्य हवामान अभ्यासकांच्या मते जुन महिन्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात अतिवृष्टी सदृश पाऊस होईल असे व्हिडिओ समाजमाध्यमांत मोठ्या प्रमाणात पसरवण्यात आले त्याच अनुषंगाने
तालुक्यात जूनच्या सुरुवातीलाच पावसाची आगमनाची चिन्हं दिसून आली होती. त्यामुळे अनेक शेतकर्यांनी पावसावर विश्वास ठेवून पहिल्या हप्त्यात पेरण्या सुरू केल्या. काही भागात पेरणी पूर्ण झाली होती, पण नंतर अचानक पावसाने पाठ फिरवली. आता तब्बल आठ-दहा दिवसांपासून पाऊस अवकाळीचा वेश घेत असल्याने पेरलेल्या बियाण्यांची उगम होऊ न शकल्यामुळे ती वाया जाण्याच्या मार्गावर आहे तसेच पावसाच्या दडी मारल्याने काही प्रमाणात उगवलेली सोयाबीन,कापूस,तुर, उडीद व मुग ही पिके उन्हाच्या चटक्यांमुळ व सोसायट्याच्या वाऱ्यामुळे शुष्काशित झाल्यामुळे करपून जात आहेत यांमुळे आता नुकसान दिसू लागले असून, दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे टाकले आहे.
शेतकर्यांनी पेरणीसाठी पतसंस्था, बँका आणि खासगी सावकारांकडून कर्ज घेतले. आता दुबार पेरणी करायची तर पुन्हा खर्च लागणार, पण पहिल्याच पेरणीचं उत्पादन मिळालं नाही. त्यामुळे ‘कर्ज फेडायचं कसं?’ हा यक्षप्रश्न शेतकर्यांना छळतोय याकारणे तालुका प्रशासनाने कृषी व महसूल विभागाने नजरपाहणी करुन होत असलेल्या नुकसानीची प्राथमिक नोंद करुन तात्काळ शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पाऊले उचलावी अन्यथा शेतकरी आर्थिक व मानसिक संकटात सापडला जाण्याची शक्यता आहे.