Home उतर महाराष्ट्र दिव्यांगांची सेवा हीच खरी जनसेवा व ईश्वर सेवा

दिव्यांगांची सेवा हीच खरी जनसेवा व ईश्वर सेवा

34
0

आशाताई बच्छाव

1001613265.jpg

श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी: दिव्यांगांची सेवा हीच खरी जनसेवा व ईश्वर सेवा म्हणावी लागेल.अपंग सामाजिक विकास संस्था व आसान दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी सातत्यपूर्ण गेल्या 25 वर्षापासून प्रयत्न करणारे संजय साळवे यांच्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्या 99% मार्गी लागलेल्या आहेत.दिव्यांगानी न्यूनगंड न बाळगता सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे.महाराष्ट्रातील श्रीरामपूर तालुका हा दिव्यांगांसाठी पथदर्शी प्रकल्प ठरत आहे.असे प्रतिपादन दै.जयबाबाचे संपादक बाळासाहेब आगे यांनी मा.ना. राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी केले.
श्रीरामपूर शहरातील सामाजिक जाणीव असणारे निलेश शिंदे यांनी स्वखर्चाने दिव्यांग बांधवांना शैक्षणिक साहित्य वाटून शैक्षणिक प्रगतीकडे वाटचाल करण्यासाठी दिव्यांगांना सहाय्य केले आहे. संजय साळवे सातत्यपूर्ण अनेक वर्षापासून दिव्यांगांसाठी विशेष उपक्रम राबवत आहे.दिव्यांगा करिता ते देव आहेत व आमच्यासाठी सुद्धा.मा.ना. राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या विशेष सहकार्यातून भविष्यात नगरपालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी विशेष घरकुल योजना राबविली जाईल.असे प्रतिपादन माजी नगरसेवक रवी अण्णा पाटील यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून केले.
निलेश शिंदे यांनी स्वखर्चाने दिव्यांग बांधवांना शैक्षणिक साहित्य वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमासाठी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे,सचिव वर्षा गायकवाड, आसान दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुस्ताकभाई तांबोळी,खजिनदार सौ.साधना चुडीवाल जिल्हाध्यक्ष विश्वास काळे,राज्य समन्वयक विनोद कांबळे सर,भारत मुक्ती मोर्चाचे सुधाकर बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुस्ताक भाई तांबोळी यांनी केले तर आभार वर्षा गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शांतुभाऊ मावरे,दिनेश पवार, सतीश साळवे,फिरोज शेख, सागर म्हस्के यांनी विशेष प्रयत्न केले.

Previous articleनाशिक महानगरपालिकेची द्वारका परिसरात अतिक्रमण मोहीम
Next articleमहावितरणच्या लेखी पत्रामुळे तोंडाला काळे फासणे आंदोलन स्थगित
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here