
आशाताई बच्छाव
फिल्मी कलाकारांच्या विशेष उपस्थितीत अमरावती येथे समाज क्रांती पुरस्कार सोहळा
पुरस्कार वितरण सोहळा ऑगस्टमध्ये दिमाखदार पद्धतीने होणार
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी
अमरावती येथील बी. एस. एफ. बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राजकीय, कृषी, औद्योगिक, सामाजिक, चित्रपट सृष्टी, पत्रकारिता, कला, क्रीडा, कलाकार अधिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाज क्रांती राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष भूषण सरदार व शितल गजभिये यांनी दिली आहे.
समाज क्रांती राज्य स्तरीय पुरस्कारासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या लोकांचे प्रस्ताव स्वीकारणे सुरु आहे. आता पर्यंत अभिनेत्री श्रावणी शिरोळकर, अंजली अहिरे, राजनंदिनी अहिरे,मनिष मुथा, ऍड. भारत गोरवे, अमित अशोक चौहान, सुरेखा गांगुर्डे, पत्रकार रमेश गोसावी,दत्तात्रय आठरे पाटील,अनिल उमाजी मस्के, डॉ संदीप विनायक काकड,पत्रकार सारंग महाजन, अभिनेत्री केतकी गावडे, अभिनेता सुरज जाधव,पत्रकार डॉ.शाम जाधव, पत्रकार रामभाऊ आवारे, पत्रकार रामचंद्र ताठे, प्रवीण जाधव, देविदास साळवे, कीर्तनकर सविता पारखे, प्रतिभा कांबळे, रावसाहेब घोडेराव, मॉडेल योगिता दांडगे, अभिनेत्री मनाली कांबळे यांना समाज क्रांती पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे. कला क्षेत्रातील त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार बी. एस. एफ. बहुद्देशीय संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा अमरावती जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात होणार असून चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या हस्ते देण्यात येणार आहे. बी. एस. एफ. बहुद्देशीय संस्थेच्या वतीने समाज क्रांती पुरस्कार सोहळा हा पहिल्यांदा चा आयोजित करण्यात येत आहे. कला, पत्रकारिता, समाजसेवा, साहित्य, कृषी व अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या लोकांना हा समाज क्रांती राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे अशी माहिती संस्थेच्या शीतल गजभिये यांनी दिली. पुरस्कार निवडीची प्रक्रिया सुरु आहे अधिक माहिती साठी 9420621994 या व्हाटस अप वर संपर्क करावा अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष भूषण सरदार यांनी दिली. आयोजक समिती मधील भूषण सरदार, गोरखनाथ वाघमारे, शैलेश मेश्राम, रॉयल सरदार, आदित्य वानखडे, ललिता वानखडे, राहुल शिंगोले, सौरव शेलारे, डॉ.शाम जाधव,सामाजिक कार्यकर्त्यां राजनंदिनी अहिरे, डॉ. संदीप काकड, अंजली अहिरे, पत्रकार रामभाऊ आवारे, पत्रकार सारंग महाजन यांनी पुरस्कार सोहळ्याची जय्यत तयारी सुरु केली आहे अशी माहिती दिली.