Yuva maratha news
आमदार साहेब रुसले ,पुण्यात जाऊन बसले.!जनतेने तुमचं काय घोडं मारलं? थोडक्या मताने का होईना त्यांनीच तुम्हाला तारलं…. धाराशिव प्रतिनिधी: विधानसभेचा निकाल लागून जवळपास सहा महिने उलटले मात्र शिंदेंच्या सेनेचे नाराज माजी मंत्री तथा भूम -परंडा -वाशी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तानाजी सावंत हे अद्यापही मतदारसंघात फिरकलेच नाहीत. सत्ता परिवर्तनासाठी दीडशे बैठका घेणारे व कोणत्या ना कोणत्या विधानामुळे सतत चर्चेत असणारे तानाजी सावंत यांचा अवघ्या 1509 मताच्या फरकाने विजय झाला आहे. राहुल मोटे यांनी सावंतांना कडवी झुंज दिली होती. मात्र जनतेच्या थोडक्या का होईना मताधिक्यामुळे सावंतांची ‘डुबती नौका’ पार नेली होती. अन् तानाजी सावंत ट्रोल झाले . मागील आठवड्यात अवकाळी पाऊस धो -धो बरसला सावंतांच्या मतदारसंघातील वाशी तालुक्यात तर पाऊस मुक्काम ठोकून होता. झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने वाशी,तेरखेडा परिसरात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसान पाहण्यासाठी किंवा बळीराजाची व्यथा जाणून घेण्यासाठी आमदार महोदयांचे पाय आपल्या बांधायला लागतील याची आशा शेतकरी वर्गाला होती .मात्र आमदार साहेब तेंव्हा देखील मतदार संघात फिरकलेच नाहीत पण पुण्यात कात्रज चौकामधील आमदार साहेबांचा ट्रॅफिक सुरळीत करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आणि नेटकर्यांनी सावंत यांना ट्रोल करण्यास सुरू केले . आता तरी आमदार मतदार संघात दिसतील का. वाशी तालुक्यात पवनचक्की कंपनीचे जाळे हळू-हळू पसरत आहे .पवनचक्की कंपनीकडून पवनचक्की उभारणीसाठी पर्यावरणाची दुर्दशा करत असल्याचे तसेच जमिनीसाठी शेतकऱ्यांवर दमदाटी करत असल्याचे निदर्शनास आले आहे .त्यामुळे कंपनीवर किंवा प्रशासनाला जा विचारणारे कोणीच नसल्यामुळे जनतेचा वाली म्हणून या आमदार महोदयाकडून अपेक्षा असल्याने ते आता तरी मतदारसंघात दिसतील का असा सवाल तालुक्यातील बळीराजा विचारत आहे. मतदारसंघात आमदार ही नाही आले अन् निधी ही नाही? विकास कामांना प्राधान्य देणाऱ्या तसेच मतदार संघात परिवर्तन घडवणाऱ्या सावंतांनी आपल्या मतदार यंदा किती रुपयांचा विकास निधी आणला असा प्रश्न देखील मतदारसंघातील जनता विचारत आहे तुम्ही येत नाहीत कमीत कमी विकास निधी तरी आमच्यासाठी पाठवा अशी चर्चा चौकात चौकातील गप्पांमध्ये सुरू आहे मंत्रीपदी वर्णी न लागल्यामुळे नाराज झालेल्या तानाजी सावंत यांनी मतदारसंघात येणे टाळी आहे शासकीय कार्यक्रम असो किंवा पक्षाचा कार्यक्रम असो तानाजी सावंत यांनी या कार्यक्रमाला पाठ फिरवत नाराज असल्याचे अनेकदा दाखवून दिले आहे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे शिंदेच्या सेनेकडे असूनही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत तानाजी सावंत यांची अद्यापही खुर्चीला खुर्ची लागली नसल्याने सावंत हे पक्षातच नाराज असल्याचे बोलले जात असून त्यांची नाराजी कधी दूर होईल व ते कधी मतदारसंघात दिसतील याची प्रतीक्षा मतदारसंघातील जनतेला लागून राहिलेली आहे.