Home जालना कृषी संकल्प अभियानांतर्गत कृषि विभागाकडून खरीप हंगाम नियोजन व मार्गदर्शन कार्यक्रम म्हसरूळ...

कृषी संकल्प अभियानांतर्गत कृषि विभागाकडून खरीप हंगाम नियोजन व मार्गदर्शन कार्यक्रम म्हसरूळ येथे संपन्न

109

आशाताई बच्छाव

1001566636.jpg

कृषी संकल्प अभियानांतर्गत कृषि विभागाकडून खरीप हंगाम नियोजन व मार्गदर्शन कार्यक्रम म्हसरूळ येथे संपन्न

जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

जाफराबाद तालुक्यातील म्हसरूळ येथे शासनाकडून राबवल्या जात असलेल्या विकसित कृषी संकल्प अभियान व खरीप हंगाम नियोजन 2025 साठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हसरूळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अमोल शिंदे सर तालुका कृषी अधिकारी जाफराबाद, धांडगे साहेब k.v.k बदनापूर, राहुल कदम k.v.k. बदनापूर, काटकर साहेब मंडळ कृषी अधिकारी जाफराबाद, जगताप साहेब सहाय्यक कृषी अधिकारी माहोरा ,शरद सहाने सहाय्यक कृषी अधिकारी म्हसरूळ ,मनोज राठोड सहायक कृषी अधिकारी येवता, संतोष गायकवाड सहाय्यक कृषी अधिकारी पिंपळगाव कड उपस्थीत होते. या सर्वांचे सरपंच मंगेश लहाने यांच्या हस्ते शाल देऊन स्वागत करण्यात आले.त्यानंतर या अधिकाऱ्याकडून शेती नियोजन कसे करावे यासाठी मार्गदर्शनाला सुरुवात झाली. सर्वप्रथम त्यांनी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेतले पाहिजे त्यामूळे आपल्याला खतांच्या मात्रा व्यवस्थित वापर करता येतो.त्यामुळे उत्पन्नात वाढ होते. तसेच बियाणे चांगल्या प्रतीचे वापरावे, बीजं प्रक्रिया केलेलेच बियाणे पेरणी साठी वापरावे. सोयाबीन सारखे घरचे बियाणे असल्यास त्यांनी उगवणशक्ती (Jarmanetion) तपासून पेरणी साठी वापरावे. पेरणीसाठी योग्य पध्दत कशी असते यावर सुध्छा मार्गदर्शन केले. पिकांची फवारणी करतांना एकच औषधी सतत न वापरता प्रत्येक फवारणीचा औषधी बदलून फवारणी घ्यावी असे सुचविले. त्यांनी काही शेतकरी यांचा शेतात जाऊन मिर्ची लागवडीची पाहणी केली असता मिर्ची सारख्या पिकांवरील व्हायरस नियंत्रणात कसा येईल याची माहिती सुध्दा अधिकाऱ्यांनी दिली. तसेच शेतीविषयी विवीध विषयांवर अधिकारी वर्ग यांनी शेतकऱ्याशी चर्चा केली.यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले म्हसरूळ येथील सरपंच मंगेश लहाने, ज्ञानेश्वर शेजुळ, पोटे सर, सोमनाथ चौधरी तसेच म्हसरूळ येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleवरुड बु.गावामध्ये ट्रॅक्टर खाली आल्याने युवा शेतकऱ्यांचा मृत्यू
Next articleमाहोरा येथे कृषी संकल्प अभियानांतर्गत कृषि विभागाकडून खरीप हंगाम नियोजनावर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.