आशाताई बच्छाव
देवळा प्रतिनिधी भिला आहेर:– स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे जयंती उत्सवा निमित जाणता राजा मित्र मंडळा तर्फे उमराणे गावातील १०वी व १२वीच्या गुणवंत विध्यार्थीचा गौरव सोहाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
येथील जाणता राजा मित्रमंडळाच्या वतीने यावर्षीही स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे जयंती उत्सवा निमित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रथमता: उमराणे वतनाचे दैवत श्री रामेश्वर महादेव मंदिरात बाळा पवार यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रतिमेचे पूजन रिपब्लिकन चळवळीचे कार्यकर्ते प्रल्हाद जमधाडे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर उमराणे मावळ खो-यातील जनता उच्च माध्यमिक विद्यालय तसेच छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल उमराणे येथील १०वि व १२विचे गुणवंत विद्याथी अदिती देवरे, जाई मोरे, यामिनी सोनवणे, अंकिता देवरे, अक्षरा देवरे, सार्थक भामरे, अजिंक्य बागुल, हर्षाली देवरे, तेजश्री देवरे, मयुरी मोरे, सुभांगी देवरे आदी विद्यार्थ्यांचा हिरामण देवरे व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिवचरित्र भेट देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी भुसार शेतमालाचे व्यापारी अशोक कर्नावट हे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन सोसायटीचे माजी चेअरमन नानाजी देवरे, विनोद पाटणी, भाऊसाहेब सोनवणे, निंबा देवरे, दत्ता जाधव, प्रकाश देवरे, पुंडलिक गायकवाड, राकेश देवरे, सचिन देवरे, माणिक देवरे, केदा देवरे, बळीराम पवार, अनिल जाधव उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी प्रास्ताविकात हिंदवी स्वराज्यासाठी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्या ३२ वर्षाच्या कालखंडातील शौर्याची माहिती विषद केली.तसेच अध्यक्षीय भाषणात कर्नावट यांनी ३५० वर्षानंतरही छत्रपती शिवाजीराजेंचे मावळे उमराण्या वतना मध्ये जाणता राजा मित्र मंडळाच्या माध्यमातून लोककल्याणकारी समाज हिताचे काम गेल्या ३१ वर्षापासून अखंडपणे सुरु असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.या मंडळाच्या कार्याचा आजच्या तरुणांनी आदर्श घ्यावा असे आव्हान कार्यक्रमा प्रसंगी केले.संदीप देवरे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे मावळे व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.आले.त्यानंतर






