Home उतर महाराष्ट्र सुपर आठचा  कालपासून धमाका सुरू 

सुपर आठचा  कालपासून धमाका सुरू 

66

आशाताई बच्छाव

1001475469.jpg

सुपर आठचा  कालपासून धमाका सुरू                     अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे 

जगदंब चषक क्रिकेट स्पर्धा : मंगळवारी अंतिम लढत
सोनई, ता. ३ जगदंबादेवी यात्रेनिमित्त सोनई येथील मुळा साखर कारखान्यावर सुरु असलेल्या जगदंब चषक क्रिकेट स्पर्धेत सुपर आठची धूम सुरू झाली आहे. शनिवारी (ता.३) दुपारपर्यंत खेडले येथील परमानंद इलेव्हन, घोडेगाव येथील घोडेश्वरी, चांदे येथील सावता इलेव्हन व सोनई येथील सावता गॅस व जगदंब इलेव्हन, अशा सहा संघाचा प्रवेश निश्चित झाला आहे.
यात्रा कमेटीचे अध्यक्ष माजी सभापती सुनील गडाख यांच्या हस्ते स्पर्धेचे उ‌द्घाटन झाल्यानंतर साखळी स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेचे मार्गदर्शक उदय पालवे यांनी भेट दिलेल्या मान्यवरांचा सत्कार केला. जगदंव मित्र मंडळ, उदयन गडाख युवा मंच व गुडमॉर्निंग मित्र मंडळाचे सदस्य स्पर्धा यशस्वी होण्यारराठी परिश्रम घेत आहेत. आज सायंकाळी सोनई येथील जगदेव इलेव्हन विरुध्द पाचेगाव येथील साईकॉन संघात झालेल्या रंगतदार सामन्यात जगदेव संघ विजेता ठरला.
दोन दिवसांत क्षितिज सोनवणे व रोहित धुमाळ या खेळाडूंनी अर्धशतक झळकावले आहे. कडक ऊन असताना
शहरटाकळी (ता. शेवगाव) येथील क्रिकेट रसिक विशाल शेळके यांनी जगदंच संघातील फलंदाजांना प्रत्येक चौकार व घटकार करीता मैदानात जाऊन एकूण पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले.
परिसरातील क्रिकेट चाहत्यांची लक्षणीय गदों होत आहे. पंच म्हणून दिलोप
सातपुते व अझम सय्यद काम पाहत आहेत. शेरखान पठाण यांचे अभ्यासपूर्ण
समालोचन चाहत्यांना खिळवून ठेवत आहे. उद्या रविवारी (ता.४) सुपर आठमधील लबतीला सुरुवात होऊन सोमवारी उपांत्य लढतीचे चार संघ निश्चित होऊन मंगळवारी अंतिम लबत व बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.
सेव्हन एसच्या माध्यमातून क्रिकेट सामने लाइव्ह दाखविण्यात येत असल्याने आयोजकांचे कौतुक होत आहे.

Previous articleशहाजीराजे छत्रपती शिवरायांचे महागुरू विश्वास पाटील : दहातोंडे यांच्या चांदे गावाला भेट
Next articleभोकरदन शहरात गारा व मेघ गरजने सह पाऊस बच्चे कंपनीने घेतला पावसात भिजत गारांचा आनंद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.