Home महाराष्ट्र लोकहित माहिती अधिकार पत्रकार संरक्षण पोलिस मित्र संघटनेची स्थापना आजपासून कार्यरत 

लोकहित माहिती अधिकार पत्रकार संरक्षण पोलिस मित्र संघटनेची स्थापना आजपासून कार्यरत 

94
0

आशाताई बच्छाव

1001461889.jpg

लोकहित माहिती अधिकार पत्रकार संरक्षण पोलिस मित्र संघटनेची स्थापना आजपासून कार्यरत
(प्रविण क्षीरसागर प्रतिनिधी)
मालेगाव:– आश्रयआशा फाऊंडेशन महाराष्ट्र प्रणित लोकहित माहिती अधिकार पत्रकार संरक्षण पोलिस मित्र संघटना आज १ मे महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर स्थापन करण्यात आली असून, संघटनेच्या माध्यमातून विविध अन्याय अत्याचार व भ्रष्टाचाराने त्रस्त झालेल्या जनसामान्यांच्या प्रश्नांना माहितीच्या अधिकारातून वाचा फोडून मोठा क्रांतिकारी स्वरुपाचा लढा उभारला जाईल व पोलीस बांधवांच्या विविध समस्या, अडचणी सोडविण्यासाठी लोकहित माहिती अधिकार पत्रकार संरक्षण पोलिस मित्र संघटनेच्या माध्यमातून व्यापक चळवळ उभारण्याचा मनोदय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांनी व्यक्त केला आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात राजेंद्र पाटील राऊत यांनी म्हटले आहे की, आश्रयआशा फाऊंडेशन महाराष्ट्र या संस्थेच्या माध्यमातून आजमितीस युवा मराठा महासंघ नावाची संघटना सामाजिक कार्यासाठी गेल्या चार वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे.तर लोकशाहीचा पाया भक्कम करण्यासाठी व अन्याय्य, अत्याचार, भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी आजपासुन “लोकहित माहिती अधिकार पत्रकार संरक्षण पोलिस मित्र संघटना”संपूर्ण महाराष्ट्र पातळीवर कार्य करण्यासाठी स्थापन करण्यात आली असून,या संघटनेच्या माध्यमातून विविध शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्याचा उद्देश संघटनेने निश्चित केलेला असून, त्याशिवाय पोलिस बांधवांच्या विविध समस्या, अडचणी तसेच पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सहकार्य करून राष्ट्रकार्य करण्याचे ध्येय धोरणानुसार या संघटनेची स्थापना महाराष्ट्र दिनानिमित्त करण्यात आली आहे.लोकहित माहिती अधिकार पत्रकार संरक्षण पोलिस मित्र संघटनेच्या गावोगावी शाखा स्थापन करून,संघटनेत अल्पसे नोंदणी शुल्क घेऊन सभासद केले जाणार आहेत.व माहिती अधिकार कायद्याची जनजागृती करून,नागरिकांत आपला हक्क आपला अधिकार याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येऊन संघटनेचे संपूर्ण महाराष्ट्रभरात जाळे विणले जाणार आहे.संघटनेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक सभासदाला अधिकृत ओळखपत्र दिले जाणार असून,संघटनेचे मुख्यालय हे मुंबई येथे असणार आहे.तरी महाराष्ट्रभरातून इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी व तरूण तरूणीनी या संघटनेत सहभागी होऊन लोकशाहीचा पाया भक्कम व बळकट करण्यासाठी लोकहित लक्षात घेता सहभागी होण्याचे आवाहन शेवटी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांनी केले आहे.संघटनेच्या अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 9923362030/9850447685 वर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here