Home जालना माहोरा येथे ह.भ.प.श्री रवींद्र महाराज महाले यांचे हरी कीर्तन संपन्न

माहोरा येथे ह.भ.प.श्री रवींद्र महाराज महाले यांचे हरी कीर्तन संपन्न

96

आशाताई बच्छाव

1001393422.jpg

माहोरा येथे ह.भ.प.श्री रवींद्र महाराज महाले यांचे हरी कीर्तन संपन्न
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
दिनांक 07/04/2025

माहोरा येथे रेणुका माता कृपेने तीन वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. चैत्र शुद्ध नवमी दिनांक 6 रविवार रामनवमी च्या शुभ मुहूर्तावर आणि अखंड हरिनाम सप्ताहाची पहिले कीर्तन श्री रवींद्र महाराज महाले यांचे वाणीतून कीर्तन संपन्न झाले. त्यांनी आपल्या वाणीतून श्री रामचंद्राची महती सांगितली. त्यांनी अनेक उदाहरणे देऊन सांगीतले की भावार्थ हा एक गुण सर्व श्रेष्ठ आहे. आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यावे. त्याशिवाय नवीन पिढी चांगली निर्माण होणार नाही. भाऊ भाऊ, नवरा बायको, सासू सूना यांनी सुध्दा चांगले राहावे नाही तर आपणच वाईट वागलो तर मुलांवर सुध्दा तेच संस्कार पडतात. तसेच त्यांनी रामायण, महाभारत, छत्रपती शिवाजी महाराज यांची उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. महाराजांनी गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी तसेच माऊली साऊंड सिस्टीम यांनी छान साथ दिल्या बद्दल आभार मानले. महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी गावातील आणि परिसरातील महिला तसेच पुरुष मोठ्या प्रमाणावर हरी कीर्तन ऐकण्यासाठी उपस्थीत होते.
तसेच ह.भ.प.पद्माकर महाराज वाघ यांनी अशीच उपस्थीती वाढवून पुढील कीर्तनाचा आणि काकडा , हरिपाठ,भावार्थ रामायण, ज्ञानेश्वरी पारायण या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

Previous articleमारुंजी येथे इंदाई पाणपोईचे उत्साहात उद्घाटन संपन्न
Next articleजालना जिल्हा परिषदेचे नवनियुक्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.उदयसिंग राजपूत साहेबांचा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सत्कार.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.