Home जालना कोसगावात शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे वावडे

कोसगावात शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे वावडे

22
0

आशाताई बच्छाव

1001369439.jpg

कोसगावात शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे वावडे

जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर-डहाके
दिनांक 30/03/2025

भोकरदन तालुक्यातील कोसगावात गेल्या कित्येक दिवसापासून शासकीय कर्मचारी गावात मुख्यालय राहत नसल्याने गावातील अनेकांची कामे रखडत चालली आहे. शिक्षक, तलाठी ,ग्रामसेवक ,कृषी सहाय्यक ,पशुवैद्यकीय कर्मचारी, वीज कर्मचारी, शासकीय कर्मचाऱ्यांची मोठी संख्या आहे परंतु यापैकी एकही कर्मचारी मुख्यालय राहत नाही याकडे संबंधी विभागाचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत प्रत्येक शासकीय कर्मचारी यांनी मुख्यालय राहण्याचा सरकारी नियम आहे परंतु या नियमाला खो देत आणि मुलांच्या क्षणाचे कारण देत परिसरातील शासकीय कर्मचारी कुणी तालुक्याच्या ठिकाणी तर कुणी जिल्ह्याच्या ठिकाणी राहून कर्तव्य बजावत आहेत सगळीकडेच शासकीय कर्मचारी मुख्यालयी राहत नाही मुख्यालयी राहण्याचे शासनाचे नियम आहेत. या नियमाची अंमलबजावणी करणारे वरिष्ठ अधिकारी मुख्यालय राहत नाही मग ते काय अंमलबजावणी करणार की असे की सर्वसामान्य नागरिक येत नसल्याने तासंतास त्यांची वाट बघत त्यांची ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे गावातील विविध खाजगी कार्यालयात दलालांचा सुळसुळाट वाढत आहे कोसगाव हे छोटेसे असून लोकसंख्या 3000 असून परंतु शासकीय कर्मचारी मुख्यालय राहत नसल्याने विविध शासकीय कार्यालयात त कामानिमित्त जावे लागते त्या संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यास कोसगाव या गावात मुख्यालयी राहण्याचे आदेश कोसगावातील सर्वसामान्य नागरिक गावातील सर्व पालकातून होत आहेत.

Previous articleगावठी कट्टा बाळगणारा आरोपी गजाआड
Next articleमायंबा येथे लाखो भाविकांनी घेतले संजीवन समाधीचे दर्शन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here