Home जालना जालना जिल्ह्यातील 500 अंशतः अनुदानित शिक्षकाचे सामूहिक आत्मदहन आंदोलन

जालना जिल्ह्यातील 500 अंशतः अनुदानित शिक्षकाचे सामूहिक आत्मदहन आंदोलन

95

आशाताई बच्छाव

1001358392.jpg

जालना जिल्ह्यातील 500 अंशतः अनुदानित शिक्षकाचे सामूहिक आत्मदहन आंदोलन

जालना प्रतिनिधी दिलीप बोंडे 
जालना जिल्ह्यातील सुमारे 500 शिक्षकाने दिनांक 20 मार्च रोजी जिल्हाधिकारी जालना यांना सामूहिक आत्मदाण्याचे निवेदन सादर केले असून हे शिक्षक दिनांक 25 मार्च 2025 रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे अंबड चौफुली पासून मोर्चा घेऊन सामूहिक आत्मदहन करणार असल्याचे लेखी निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर जिल्ह्यातील सुमारे 500 शिक्षकांच्या सह्या असून त्या निवेदनात असे म्हटले आहे की, तत्कालीन महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाने दिनांक 10 ऑक्टोंबर 2024 च्या मंत्रिमंडळ बैठकीच्या मंजुरीने दिनांक 14 ऑक्टोंबर 2024 च्या शासन निर्णय निर्गमित केला होता या शासन निर्णयात सुमारे 52 हजार 500 शिक्षकांना 20 टक्के अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा त्या शिक्षकांच्या हेडन्याय अनिवार्य खर्चातून त्यांचा पगार करावा असे म्हटले होते परंतु या शासन निर्णयास देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने डिसेंबर 2024 च्या पुरवणी अर्थसंकल्पात त्याला कुठलीही तरतूद न केल्याने व मार्च 2025 26 च्या अर्थसंकल्पात सुद्धा कुठलीच तरतूद न केल्याने राज्यभरातील शिक्षकांत शिक्षका ंत असंतोष निर्माण झाला आहे यातूनच मागील आठवड्यात बीड येथील विनाअनुदानित शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी गळफास लावून घेत या प्रश्नाकडे राज्याचे व सरकारचे लक्ष वेधले होते त्यानंतर चार बांधवांचा सरकारने अर्थसंकल्पात कुठल्याच निधीची तरतूद न केल्याने नैराश्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे
तसेच दिनांक पाच मार्च 2025 पासून आझाद मैदान मुंबई येथे शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आंदोलन सुद्धा 14 ऑक्टोंबर 2024 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ व्हावी याकरता सुरू आहे.

Previous articleकत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ११ गोवंशीय जनावरांची सुटका
Next articleआरएनआय कडून ९९ हजार वृत्तपत्रांवर बंदी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने व्यक्त केली तीव्र नाराजी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.