Home बुलढाणा काकणवाडा खुर्द साज्यातील पाणंद रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास !

काकणवाडा खुर्द साज्यातील पाणंद रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास !

17
0

आशाताई बच्छाव

1001341820.jpg

काकणवाडा खुर्द साज्यातील पाणंद रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास !

ग्राम महसूल अधिकारी सुषमा कांबळे यांच्या पुढाकाराने पांदन रस्ता मोकळा!

प्रतिनिधी | संग्रामपूर स्वप्नील देशमुख 
मुख्यमंत्री गतिमान प्रशासन यांच्या शंभर दिवसीय कार्यक्रमानुसार पाणंद रस्ते मोकळे करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. याअंतर्गत, संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर मंडळातील काकणवाडा खुर्द साजा अंतर्गत येणाऱ्या काकणवाडा खु. ते कोलद व काकनवाडा खु. ते माळेगाव असे दोन्ही बंद असलेले शेत रस्ते तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २१ मार्च रोजी मोकळे करण्यात आले.
यासाठी मंडळाधिकारी रवींद्र बोराखडे, ग्राम महसूल अधिकारी श्रीमती सुषमा कांबळे उपस्थित होते. महसूल विभागाने पुढाकार घेत अतिक्रमण काढून दिलेल्या या दोन्ही रस्त्यांवर गावातील शेतकऱ्यांच्या सहकार्याने लोकसहभागातून जेसीबी द्वारे दोन्ही रस्ते मोकळे करून रस्त्याचे निर्माण सुरू झाले आहे. मंडळ अधिकारी बोराखडे आणि ग्राम महसूल अधिकारी सुषमा कांबळे यांच्या उपस्थितीत पाणंद रस्त्याचे भूमिपूजन केले. यावेळी ग्रामसेवक बोडखे, गोपाल अढाव सरपंच काकणवाडा खुर्द, नंदु पाटील अढाव, उमेश आढाव, ज्ञानेश्वर अढाव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

# पांदन रस्ते मोकळे झाल्याने या दोन्ही रस्त्याच्या २५० हेक्टर जमिनीच्या १५० शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी यापुढे सोयीचे होणार आहे तसेच वाहने सुद्धा शेतापर्यंत नेता येतील.

Previous articleकेमिकल लिकेज आपत्तीबाबत रंगीत तालीम.
Next articleशिवद्रोही प्रशांत कोरटकरला अटक करा अन्यथा राज्याभरात तीव्र आंदोलन, मराठा क्रांती मोर्चा, शिवप्रेमी संघटनांचे धरणे आंदोलन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here