Home जालना स्वामी विवेकानंद हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालय बुटखेडा शाळेचा एन.एम. एम.एस.परीक्षेचा निकाल...

स्वामी विवेकानंद हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालय बुटखेडा शाळेचा एन.एम. एम.एस.परीक्षेचा निकाल शंभर टक्के(100%)

223

आशाताई बच्छाव

1001226078.jpg

स्वामी विवेकानंद हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालय बुटखेडा शाळेचा एन.एम. एम.एस.परीक्षेचा निकाल शंभर टक्के(100%)
जाफराबाद तालुका प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
दिनांक 12/02/2024

सविस्तर वृत्त असे की जाफराबाद तालुक्यातील स्वामी विवेकानंद हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालय बुटखेडा येथील एन.एम.एम.एस.परीक्षा 2024 ला एकूण 82 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 82 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. प्रथम क्रमांक सृष्टी ज्ञानेश्वर बनकर 122 गुण, द्वितीय क्रमांक धनश्री गणेशराव सवडे 118 गुण, तृतीय क्रमांक शुभम शालिकराम जगताप 117 गुण या परीक्षेत शंभर पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी ४६ आहे. या परीक्षेमध्ये पात्र ठरणारे विद्यार्थी यांना चार वर्ष दरवर्षी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच जवळपास 70 विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवृत्ती मिळणार आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री शंकरराव ढवळे, सचिव प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब ढवळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे. या यशामध्ये प्राचार्य सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाची योगदान आहे. प्राचार्य तथा सर्व टीमचे संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी अभिनंदन करून कौतुक केले आहे .या वर्षी एन.एम.एम.एस.चा निकाल शंभर टक्के लागल्याबद्दल परिसरातील माता पालक ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.

Previous articleघानखेडा येथील माजी सैनिक श्री अजबराव लहाने यांची सेवानिवृत्तीबद्दल मिरवणूक
Next articleभगवान विश्वकर्मा यांनी निर्मिलेल्या सर्व वास्तू या निसर्ग पूरक आणि अद्भुत _शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.