Home जालना मराठवाडा शिक्षक संघाच्या धरणे आंदोलनाचा परिणाम. परिक्षक व नियामक शिक्षकांच्या मानधनात वाढ.

मराठवाडा शिक्षक संघाच्या धरणे आंदोलनाचा परिणाम. परिक्षक व नियामक शिक्षकांच्या मानधनात वाढ.

195

आशाताई बच्छाव

1001217313.jpg

मराठवाडा शिक्षक संघाच्या धरणे आंदोलनाचा परिणाम. परिक्षक व नियामक शिक्षकांच्या मानधनात वाढ. जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 08/ 02/2025
महाराष्ट्र राज्य माध्यमिक वउच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर या कार्यालया समोर दिनांक ८ जानेवारी २०२५ रोजी विविध मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये प्रामुख्याने मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी नियुक्त केलेले परिक्षक व वरिष्ठ परिक्षक तसेच नियामक आणि वरिष्ठ नियामक यांच्या मानधनात फेब्रुवारी/ मार्च२०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या परिक्षांसाठी नियुक्त शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय दि१०जानेवारी व २१जानेवारी रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या सहविचार सभेमध्ये घेण्यात आला यावेळी मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्रीय अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव, सरचिटणीस राजकुमार कदम, उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे, मार्गदर्शक निवृत मुख्याध्यापक डी जी तांदळे, डॉ पुरुषोत्तम जुन्ने, छत्रपती संभाजीनगर सचिव चंद्रकांत भाई चव्हाण, मार्गदर्शक डॉ उमाकांत राठोड, जालना जिल्हा सचिव संजय येळवंते, कार्याध्यक्ष फरखुंद अली सय्यद, जाफ्राबाद तालुकाध्यक्ष सुधाकर डोईफोडे, सचिव बी टी लंके, भागवत काकडे, अजित बारहाते, संजय चव्हाण, शेख जावेद, खलील शेख हे व इत्यादी बहाद्दर शिलेदार व कार्यकर्ते उपस्थित होते

Previous articleब्रेकिंग ! ‘त्या’ कोनशीला झाकल्याने हर्षवर्धन सपकाळ भडकले ! – म्हणाले.. जिल्हा परिषद -भ्रष्टाचाराचा अड्डा !
Next articleबहारदार त्रैभाषिक गझल मुशायर्‍यात रसिक मंत्रमुग्ध
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.