आशाताई बच्छाव
रस्त्याच्यासाठी खासदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनद्वारे मागणी
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
देगलूर – खासदार रवींद्र चव्हाण यांना देगलूर तालुक्यातील बल्लूर फाटा ते बल्लूर – गवंडगांव, शिवणी,पेंडपल्ली – झरी, माळेगांव (डावीकडे क्षीरसमुद्र – हाळी, बेंबरा तांडा) – मरतोळी, अंबूलगा, भूतनहिप्परगा, सोमुर- बेंबरा, मानूर, गो.गो तांडा, या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निवेदन देण्यात आले. कै. वसंतराव चव्हाण यांनी मानूर येथील जाहीर सभेत निवडून आल्यानंतर प्रथम प्राधान्य या रस्ताचा कामासाठी असेल असे जाहीरपणे जनतेस विश्वास दिले होते परंतू दुर्दैवाने ते आपल्यात नसून खासदार रवींद्र चव्हाण यांना त्याच्या शब्दाची आठवण करून देतं, त्यांनी दिलेल्या विश्वासास तडा न जाऊ देता या रस्ताच्या कामात प्रत्यक्ष स्वत लक्ष देऊन जलद गतीने मंजुरी आणून नवीन करून या सिमाभागास न्याय द्यावे अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली.
बल्लूर ते मानूर हा रस्ता दुरुस्ती कामे प्रस्तावित व मंजूर कालवधीत होणे संबधित विभागाची जबाबदारी असताना तसे कार्य झाले नाहीत यामुळे विषयी नमूद रस्ताची दुरवस्था झाली आहे. हा सीमावृत्ती भाग आहे. रस्तालगतच्या सर्व गांवकऱ्यांनी विश्वास घेऊन सदरील रस्ताचे सक्षम काम जलद गतीने करून सार्थ करावे असे मत उपस्थित नागरिकांनी मांडले. यावेळी उपस्थित ऍड. अंकुशराजे जाधव, विशाल पवार, शिवकुमार बिरादार, सचिन पाटील, वैभव पाटील, श्रीराम पाटील, विष्णू रेड्डी, दीपक रेड्डी, राहुल फिरंगे, राजू वाघमारे, राजू वाघमारे, आदी संघर्ष समितीचे सहकारी उपस्थित होते






