आशाताई बच्छाव
नारी रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मीराताई कदम यांचा सत्कार
हिंगोली, श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ –येथील जिजामाता नगर येथे असलेल्या निराधार मुलांचे वस्तीग्रह सेवासदन हिंगोली येथील वसतिगृहाच्या संचालिका सहशिक्षिका तसेच समाजसेविका मिराताई धनराज कदम यांना लोकसत्ता नारी रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल. प्रा. पंजाब आंबोरे, वसमत येथील वाचनालयाचे शेक इब्राहिम, वसमत येथील नवोदय विद्यालयातील शिक्षक राजेश यादव, रहमत यांनी हिंगोली येथील निराधार मुलांचे सेवासदन ला भेट देऊन मीराताई कदम यांना लोकसत्ताचा नारी रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मीराताई कदम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
निराधार मुलांचे वस्तीगृह सेवा सदन ला भेट दिल्याबद्दल खूप समाधान वाटले असे यावेळी प्रा पंजाब आंभोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. निराधार मुलांचे वस्तीग्रह सेवा सदन यांना शासनाचे अनुदान नसतानाही आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षण देणे व त्यांचा संगोपन करणे हे फार मोठे काम असून सुद्धा हे काम मीराताईंनी केलं त्याबद्दल मीराताईंचे खूप खूप अभिनंदन असे यावेळी अंभोरे सर यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी सेवा सदन चे धनराज कदम, पत्रकार शिवाजी कऱ्हाळे अमर गायकवाड ,अमर साखरे यांच्यासह सेवा सदनमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






