आशाताई बच्छाव
वसमत तालुक्यातील इंजनगाव पश्चिम येथे दोन गटात जाग्यावरून मोठावाद एकमेवर दगडफेक करून अनेक जखमी
हिंगोली, श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ.जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील इंजनगाव पश्चिम येथे गेल्या तीन वर्षापासून जागेचा वाद सुरू आहे. मातंग समाज व बोध्द समाज यांच्यातील जाग्यावरून हा असलेला वाद हा आधीक मोठ्या प्रमाणामध्ये झाला आहे.
गावातील धार्मिक स्थळ असलेल्या जागेवरून हा वाद निर्माण झाला आहे एकंदरीत 13 गुंठे जागेवरून हा वाद निर्माण झाला असल्याचे माहिती मिळते पन ह्या जागा संदर्भात महसूल प्रशासन विभाग या संदर्भात आधीक माहिती आहे कि एकुनच किती जागा होती त्यापैकी किती जागा कोनत्या धार्मिक स्थळास आहे व उर्वरित किती जागा उपलब्ध आहे.
आज रोजी झालेला हा वाद जो निर्माण झाला तो वाद दोन गटांतील सुरू होता तर
एका गटाने जाहीर ध्वज उभारला.
हा प्रकार दुसर्यां गटाला कळताच त्याठिकाणी मोठा जमाव एकत्र आल्याने दोन्ही गटात एकमेकांना बोलण्यावरून मोठा वाद वाढत गेला व सदरील वादाचे रूपांतर हाणामारी व एकमेकांच्या अंगावर दगडफेक करून दोन्ही गटातील अनेक या वादात जखमी झाले आहेत सदरील बाबीची माहिती नंतर वसमत ग्रामीण पोलीस स्टेशन ला मिळताच ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल काचंडे, उपनिरीक्षक संतोष मुपडे, अंभोरे, शेख जावेद, ढवळे, विजय उपरे, अरविंद राठोड यांच्या घटनास्थळी धावघेवुन दोन्ही गटालतील वाद मिटवण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न केले
वरिष्ठ पोलीस आधिकारी जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन्ही गटावर पोलीस प्रशासनाने अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी उपस्थीत असताना एकमेकांवर तुफान दगडफेकीत सुरू होती
पोलीस कर्मचारी मोठया प्रमाणावर संख्याबळ उपस्थित होते पोलिस अधिक्षक श्रीकृष्णकाटे, अप्पर पोलिस अधिकारी अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक विकास पाटील मोठा पोलिस बंदोबस्त घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी जमावावर नियंत्रण मिळवले आहे.
दोन्ही गटातील समाज बांधव एकत्र येऊन २५नोव्हेबर नंतर हा वाद मिटवण्यासाठी एकत्र येऊन समाज बांधव वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रसार माध्यमांला माहिती केले आहे.






