Home जालना १५ वर्षापासून प्रलंबित असलेले शेतरस्ते ‘समृद्धी’ने केले दुरुस्त

१५ वर्षापासून प्रलंबित असलेले शेतरस्ते ‘समृद्धी’ने केले दुरुस्त

26
0

आशाताई बच्छाव

1000747667.jpg

१५ वर्षापासून प्रलंबित असलेले शेतरस्ते ‘समृद्धी’ने केले दुरुस्त
स्वखर्चातून रस्ते तयार केल्याने शेतकऱ्यांनी मानले सतीश घाटगेंचे आभार
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ): गेल्या पंधरा वर्षापासून शेकडो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला अंबड तालुक्यातील धाकलगाव ते नावडे वस्ती व घनसावंगी तालुक्यातील हरसिंग नाईक तांडा ते राणी उंचेगाव हा शेत रस्ता नादुरुस्त होता. वारंवार हे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी शेतकरी करत होते. परंतु त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. पाच वेळा स्थानिक आमदाराने या रस्त्यावर नारळ फोडले पण काम काही केले अन्ही. शेवटी समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी स्वखर्चातून हे दोन्ही रस्ते शुक्रवारी तयार करायला सुरुवात केली. यामुळे दोन्ही गावातील शेतकऱ्यांनी सतीश घाटगे यांचे आभार मानले..

घनसावंगी तालुक्यातील हरसिंग नाईक तांडा ते राणी उंचेगाव हा रस्ता नादुरुस्त असल्याने येथील शाळकरी मुलांना शाळेत जाता येत नव्हते.  तसेच शेतकऱ्यांना शेतात जाणे जिकरीचे बनले होते. अशीच स्थिती धाकलगाव ते नावडे वस्ती या रस्त्यामुळे दाखल गाव येथील शेतकऱ्यांची होती या दोन्ही गावातील शेतकऱ्यांनी सतीश घाडगे यांची भेट घेऊन हे रस्ते दुरुस्त करून देण्याची मागणी दोन दिवसापूर्वी केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेऊन सतीश घाटगे यांनी या दोन्ही रस्त्याचे काम स्वखर्चातून सुरू केले अगोदर काम सुरू करून नंतर या रस्त्याचे उद्घाटन त्यांनी केले. यावेळी दोन्ही गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक वर्षापासूनची मागणी दोन दिवसात पूर्ण केल्यामुळे सर्व शेतकरी आनंदी झाले. त्यांनी सतीश घाटगे यांचे आभार मानले.

Previous articleगणेशोत्सवानिमित्त ओमप्रकाश देवडा बँकेत भास्करराव दानवे यांच्या हस्ते आरती,महाप्रसाद!
Next articleजानेफळ पंडित गावात रात्रीच्या वेळी ड्रोन कॅमेऱ्याच्या घिरट्या, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here