Home जालना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने मस्तगड येथे मनुस्मृतीचे दहन; सरकार विरोधात...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने मस्तगड येथे मनुस्मृतीचे दहन; सरकार विरोधात जोदार घोषणाबाजी

14
0

आशाताई बच्छाव

1000683460.jpg

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने मस्तगड येथे मनुस्मृतीचे दहन; सरकार विरोधात जोदार घोषणाबाजी                                                      जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)

जालना शहरातील मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष तथा युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव शेषराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली रविवार दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1 वाजता मनुस्मृतीचे दहन करुन आंदोलन करण्यात आलं.
संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचे दहन करून देशातील सर्व जातींच्या महिलांना सन्मानाने जगण्याचा व समानतेचा हक्क मिळवून दिला. परंतु, शिंदे सरकारने मनुष्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय घेतल्याने त्याला विरोध करण्यासाठी मनुस्मृतीचे दहन करुन आंदोलन करण्यात आलं असल्याचं शेषराव जाधव यांनी म्हटलंय. यावेळी कुणाल दादा राऊत मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष जाधव, भाऊसाहेब वारे, सुभाष नरोडे, मदन वाघ, किशोर गायकवाड, भालेराव, विकी आठवले, आकाश हिवाळे, विकास कारगे, प्रभु दाभाडे, प्रभु लोखंडे यांची उपस्थिीती होती. दरम्यान मनुस्मृतीचे दहन करुन सरकार विरोधात जोरदार घोषणबाजी करण्यात आली. काँग्रेसचे जेष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात मनुस्मृती दहनाचे आंदोलन करण्यात येत असून त्याच प्रकारे जालना येथे देखील आंदोलन करण्यात आलं. असेही शेषराव जाधव यांनी यावेळी सांगितले.

Previous articleबेस्ट ब्युटीशियन पुरस्कार वितरण साहळा उत्साहात; 23 रक्तदात्यांनी केलं रक्तदान
Next articleगज केसरी कंपनी स्फोट प्रकरणी कारवाई होईलच मात्र कामगारांचा जीव महत्त्वाचा – खा. डॉ. कल्याण काळे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here