आशाताई बच्छाव
सामाजिक माध्यमांचा चक्रव्यूह – न्यायाचार्य शास्त्री भगवान बाबा.
तालुका प्रतिनिधी जाफराबाद-मुरलीधर डहाके
दिनांक 20/08/2024
सविस्तर वृत्त असे की, भगवान बाबा यांच्या विचारातून असे सुचवले की, समाज माध्यम खूप प्रभावी आहेत. आजचा मनुष्य त्यात गुंतत चालला आहे. ज्या बातम्यांची जीवनाला अवशकाता नाही.जे ज्ञान जीवनाला शांती देऊ शकत नाही.ते आपल्यापुढं सतत येत आहे.
असलेलं सुख नष्ट करणारी अशी आजची सामाजिक माध्यम आहेत. अनेकांचे जीवन उध्वस्त झाली असून,अजून पुढं काय होईल? हे सांगता येत नाही. अशांतता वाढवणार प्रपंचाच ज्ञान आपल्या हातात आलं आहे. सुशिक्षितांसह सामान्य या चक्रविव्हात पूर्णपणे अडकले आहेत. किंबहुना गोविले जात आहेत. आपला विसर आपल्यालाच पडावा या अवस्थेपर्यंत ही माध्यम आली आहेत.