Home जालना जम्मू-कश्मिरमधील भ्याड हल्ल्यांच्या विरोधात शिवसेनेची तीव्र निदर्शने

जम्मू-कश्मिरमधील भ्याड हल्ल्यांच्या विरोधात शिवसेनेची तीव्र निदर्शने

46
0

आशाताई बच्छाव

1000562115.jpg

जम्मू-कश्मिरमधील भ्याड हल्ल्यांच्या विरोधात
शिवसेनेची तीव्र निदर्शने
जालना, दि. १८(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)-जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या
भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जालना शहरातील देशभक्त नागरिक व शिवसेना
(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शहारातील महात्मा गांधी चौक
(चमन) येथे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या
मार्गदर्शनाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली.
मागील काही महिन्यात जम्मू-काश्मिर राज्यात दहशतवाद्यांनी वारंवार हल्ले
करून देशातील नागरिक यात्रेकरू व सैनिकांना लक्ष केले आहे. त्यांच्या या
हल्ल्यात नाहक अनेक सैनिक बळी जात आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर
केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात येत असलेली नाकर्तेपणाची भूमिका या
सर्वांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने शहरातील गांधी
चमन येथे उपजिल्हाप्रमुख बाबुराव पवार, शहर प्रमुख बाला परदेशी, विजय
पवार, गंगुताई वानखेडे, डॉ. राजेश राउत, संदीप झारकंडे, संजय रत्नपारखे,
संदीप नाईकवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीतीत प्रचंड घोषणाबाजी करून तीव्र
निदर्शने करून निषेध करण्यात आला.
यावेळी वसीम खान पठाण, संदीप साबळे,संतोष क्षत्रिय, संदिप मगर, राजू
परदेशी, अनील अंभोरे,सखावत पठाण, जीवन खंडागळे, सोनाजी खांडेभराड,सागर
ठाकूर,रामेश्वर कुरील,महादू जाधव, संदीप जाधव, विशाल तेझाड,शाम जमधडे,
महादेव कावळे,शाम कुलथे,शेख तणवीर, नितीन जाधव, शेख सलमान, नविद काझी,
शेख फरदिन, शेख समीर, हमीद मणियार, दुर्गेश शिंदे आदी शिवसैनिक व
नागरिकांची उपस्थिती होती.
००००००००००००

Previous articleराज्य राखीव पोलीस बलाच्या शारीरिक व मैदानी चाचणीचा शेवट मंगळवारी
Next articleभामरागड ते आरेवाडा रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे..!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here