Home जालना पंढरपूर विठ्ठल दर्शन पायी वारी मधील सांगितलेले अनुभव -विठ्ठल भक्त रामदास बदर

पंढरपूर विठ्ठल दर्शन पायी वारी मधील सांगितलेले अनुभव -विठ्ठल भक्त रामदास बदर

227

आशाताई बच्छाव

1000552202.jpg

पंढरपूर विठ्ठल दर्शन पायी वारी मधील सांगितलेले अनुभव -विठ्ठल भक्त रामदास बदर
तालुका प्रतिनिधी जाफराबाद-मुरलीधर डहाके
दिनांक १६ /०७/२०२४
सविस्तर वृत्त असे की, जाफराबाद तालुक्यातील बदर वाडीचे रहिवासी असलेले हरिभक्त रामदास तुकाराम बदर हे शेतकरी दरवर्षी आषाढी एकादशीला दर्शनासाठी पंढरपूरला पायी वारी करतात. त्यांनी सांगितले की, आमच्या आजोबा आणि वडील दरवर्षी वारी करायचे तीच परंपरा कायम ठेवत आमची तीसरी पिढी पायी वरीत सहभागी होऊन दर्शनाला जातो. आमच्या परिसरातील म्हसरूळ,जवखेडा ठेंग, जानेफळ , बोरगाव फदाट, खासगाव, परिसरातील अशा गावातून १००ते १५० विठ्ठल भक्त एकत्र येऊन पायी वारी प्रवास सुरू होतो. आता आम्ही पायी वारी करुण पंढरपूर दर्शनाची परंपरा कायम ठेवत आहोत. आम्ही वारीमध्ये दररोज २५ते३० किलोमीटरचा पायी प्रवास करतो . प्रवासा दरम्यान विठ्ठल भक्त दिंडीची चहा, नाष्टा, व जेवणाची व्यवस्था करतात. त्यामूळे विठ्ठल नामाच्या गजरात पंढरपूर केव्हा येते कळतच नाही.
“विठ्ठलाच्या पायी’ विट झाली भाग्यवंत.’ या उक्तीप्रमाणे आम्ही सर्व वारकरी भाग्यवंत झाल्याचे समाधान आम्हाला पंढरपूरची वारी केल्यानंतर अनुभव येतो असल्याची प्रतिक्रिया विठ्ठल भक्त रामदास कदम यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली.

Previous articleभिवंडीत उघड्या वाहनातून कचऱ्याची वाहतूक; मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष
Next articleमहाएकादशी – आषाढी एकादशी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.