आशाताई बच्छाव
घाईगडबडीत शेतकऱ्यांकडून पेरण्या पण पावसाची हुलकावणी; बुलढाणा तालुक्यात दुबार पेरणीचे संकट…
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– यंदा चांगल्या पावसाची हवामान खात्यासह अनेक तज्ञ मंडळींनी अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी शेतीमशागतीवर चांगलाच भर दिला होता. त्यात बुलढाणा तालुक्यात बऱ्याच ठिकाणी जूनच्या पहिल्याच आठवड्यात हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी वर्गातही आनंदाचे वातावरण होते. त्यात काही शेतकऱ्यांनी घाईगडबडीत पेरण्याही आवरल्या.
यामध्ये सोयाबीन, उडीद, मुंग भुईमूग इत्यादीचा समावेश होता. मात्र, जूनच्या पहिल्या आठवड्यात बरसलेला वरूणराजाने काही दिवसांतच पाठ फिरवल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. आणखी काही दिवस जर पाऊसच झाला नाही. तर मात्र, दुबार पेरणीचे संकट आता शेतकऱ्यांसमोर आले आहे. आधीच आर्थिक ताळमेळ बिघडलेल्या शेतकऱ्यांची आता मोठी पंचाईत झाली आहे.
वाढलेले बियाणे खतांचे दर, शेतीमशागतीचे दर, त्यात दुबार पेरणीचे संकट यांमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. तर कृषी विभाग इतर तज्ञ मंडळींनी शेतकऱ्यांनी घाई गडबड न करण्याचे आवाहान केले.100 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे सांगितले आहे.बुलडाणा तालुक्यात अद्यापही तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे जमिनीत तसा गारवा ही झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी 100 मिली लीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याची कृषी विभागाने आव्हाने केले होते






