आशाताई बच्छाव
माहोरा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी त्रस्त
महोरा प्रतिनिधी -मुरलीधर डहाके
याविषयी सविस्तर वृत्त असे की,
जाफराबाद येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मनमानी कारभारामुळे तालुक्यातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. माहोरा येथे शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. दुष्काळी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले असतांनाही बॅंकेच्या मॅनेजरच्या व कॅशियरच्या मनमानी कारभारामुळे तो वेळेवर शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या कामात येत नाही. शेतकऱ्यांनी विचारणा केली असता ऑनलाईनच्या नावाखाली शेतकऱ्यांना नको ते कारण दाखवून खाली हाताने शेतकऱ्यांची बोळवण करण्यात येत आहे.उद्या या ,परवाला या आज साहेब नाही, बॅंकेत पैसे नाहीत असे बेजबाबदार वर्तन केले जात आहे.आशा प्रकारे शेतकऱ्यांना बॅंकेत हेलपाटे मारावे लागत आहेत.हे उडवा-उडविचे उत्तर ऐकून शेतकऱ्यांना कंटाळा आला आहे. आमच्या प्रतिनिधींनी शाखाधिकारी कोठे आहे याविषयी विचारणा केली असता आम्हाला तुम्ही विचारणारे कोण,आमचे कोणी काहीही बिघडवू शकत नाही अशा प्रकारे बेजबाबदारपणे उत्तर उपस्थित कर्मचाऱ्यांनी दिले असल्याचे समजले आहे. असे किती फोटो काढणार आले आणि गेले आमचे कोणी काही करू शकत नाही तर शेतकरी राजा चिंतातुर झालेला आहे.शेतकऱ्यांना कोणी वाली नाही.यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल का ? आणि आपली बाजाराची थैली रिकामी घेऊन शेतकरी घरी परत जातात ही दयनीय अवस्था जाफराबाद येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकरी खातेदारांवर आलेली आहे.दोन हजार रुपयासाठी जवळपास दहा ते पंधरा चक्रा शेतकऱ्याला माराव्या लागतात कामधंदा, बैल ,शेतीची मशागत सोडून सुद्धा त्यांच्या पदरी फक्त आणि फक्त निराशाच पडत आहे. 45 अंश तापमान असूनही सुद्धा बँकेत कुठे पाण्याची व्यवस्था नाही कुठे फॅन नाही आणि शेतकऱ्यांना दादागिरीच्या भाषेत बॅंकेचे कर्मचारी बोलतात. पैसे काढायचे असेल तर साहेबांना भेटा आणि वशिलेबाजी ने पैसे काढले जातात. अशीच परिस्थिती सुरू असल्यास एक दिवस शेतकरी हा संपल्याशिवाय राहणार नाही ,तरी मायबाप सरकारने शेतकऱ्यांची ही अडचण दूर करून बँकेवाल्यांची योग्य ते कान उघाडणी करुन अशा बेजबाबदारपणे वागणाऱ्या व कामचुकार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी व शेतकऱ्यांना सहकार्य करावे असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.






